शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कोकण बोर्डाने गुणवत्ता सिद्ध केली

By admin | Updated: June 13, 2015 00:14 IST

दीपक केसरकर : दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सिंधुदुर्गनगरीत गौरव

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, तसाच तो शिक्षणातही आघाडीवर आहे. यंदा दहावी व बारावीच्या निकालात सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी भर देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दहावी व बारावीमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, ग्रामविकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक उपस्थित होते.केसरकर म्हणाले, शिक्षण विभागाने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी, असे आदेशही केसरकर यांनी शिक्षण विभागाला यावेळी दिले.यावेळी जिल्ह्यातील दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार, द्वितीय क्रमांक प्राप्त ३ हजार व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना २ हजार रूपये पारितोषिक वितरण करण्यात आले. दहावीमध्ये अद्वैत देसाई याने ९८.४० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ५ हजार रूपये, अन्विता कुलकर्णी, भार्गव नारकर, नेहा पावसकर या विद्यार्थ्यांनी ९८.२० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रत्येकी ३ हजार रूपये, तसेच रोहित कुलकर्णी, कन्हय्या राऊत, जुई निगुडकर यांनी ९८ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रत्येकी २ हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.बारावीमध्ये सागर सामंत याने ९५.८४ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ५ हजार रूपये, मंदार चव्हाण याने ९५.०७ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ३ हजार रूपये, कृपा प्रभूने ९२.६१ टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल २ हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच शासकीय बालगृह ओरोसमधील राजाराम पेडणेकर, नारायण गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी १११ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल, २३ ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार वैभव नाईक, जिल्हााधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजीराव देसाई यांनी आभार मानले. या साऱ्या कार्यक्रमाला सिंधुर्गातील पालक, यशश्वी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)कुशल मनुष्यबळ तयार करणारकेसरकर म्हणाले, स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात लवकरच होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच राहून स्पर्धा परीक्षांना बसून आपली गुणवत्ता सिद्ध करणे शक्य होईल. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने काही विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. स्थानिक ठिकाणी नोकरी करण्यासाठी प्राधान्य देतात, अशा विद्यार्थ्यांकरिता खास प्रशिक्षण आयोजित करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच पर्यटनावर आधारित रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मंत्र्यांनी केले कौतुक. जिल्हा नियोजन समितीमध्ये करण्यात आला गौरव. कोकण बोर्डाने गुणवत्ता सिध्द केल्याचे विशेष कौतुक. केसरकर यांनी केलेय विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक. विविध मान्यवरांच्या सत्कार.