शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

खेड - दापोली राष्ट्रवादीकडे ?.. राजापूर काँग्रेसकडे : गुहागर महायुतीत विघ्न

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

गुहागरवरून वादंग होण्याची शक्यता

खाडीपट्टा : विधानसभा निवडणुकीला दोन महिने अवधी असतानाच उमेदवार निवड प्रतिक्रियेला चांगलीच गती आली आहे. पक्षांतर्गत जागा वाटप व उमेदवार निवड प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसकडे राहणार असून, दापोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यात एकत्र निवडणुका लढवत असून, उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाच्या अदलाबदलीत जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसकडून मिळविण्यात यशस्वी झाली आहे. दापोली हा परंपरागत काँग्रेसकडे असलेला मतदार संघ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जिल्ह्यात केवळ राजापूर मतदार संघातून लढताना दिसणार आहे.जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर व दापोली हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी, तर तीन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.जिल्ह्यात शिवसेना - भाजप युतीकडून राजापूर, चिपळूण, दापोली व गुहागर हे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असून, रत्नागिरी मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. महायुतीमध्ये गुहागर मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपाला मिळावा, असा आग्रह धरला जात असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळल्याचे समजते. मागील निवडणुकीत गुहागर मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती, तर अपक्ष लढलेले विनय नातू तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. ही जागा शिवसेना सोडण्यास तयार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यात विशेषत: गुहागर मतदार संघात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)गुहागरवरून वादंग होण्याची शक्यतागत विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही त्यांची पाठराखण केली आहे. आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.