शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

खेड - दापोली राष्ट्रवादीकडे ?.. राजापूर काँग्रेसकडे : गुहागर महायुतीत विघ्न

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

गुहागरवरून वादंग होण्याची शक्यता

खाडीपट्टा : विधानसभा निवडणुकीला दोन महिने अवधी असतानाच उमेदवार निवड प्रतिक्रियेला चांगलीच गती आली आहे. पक्षांतर्गत जागा वाटप व उमेदवार निवड प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसकडे राहणार असून, दापोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यात एकत्र निवडणुका लढवत असून, उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाच्या अदलाबदलीत जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसकडून मिळविण्यात यशस्वी झाली आहे. दापोली हा परंपरागत काँग्रेसकडे असलेला मतदार संघ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जिल्ह्यात केवळ राजापूर मतदार संघातून लढताना दिसणार आहे.जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर व दापोली हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी, तर तीन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.जिल्ह्यात शिवसेना - भाजप युतीकडून राजापूर, चिपळूण, दापोली व गुहागर हे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असून, रत्नागिरी मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. महायुतीमध्ये गुहागर मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपाला मिळावा, असा आग्रह धरला जात असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळल्याचे समजते. मागील निवडणुकीत गुहागर मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती, तर अपक्ष लढलेले विनय नातू तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. ही जागा शिवसेना सोडण्यास तयार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यात विशेषत: गुहागर मतदार संघात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)गुहागरवरून वादंग होण्याची शक्यतागत विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही त्यांची पाठराखण केली आहे. आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.