शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

खारभूमी कार्यालय जिल्ह्यातच राहणार

By admin | Updated: June 21, 2017 00:23 IST

स्थगितीच्या आदेशामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय बंद करण्यास शासनाच्या जलसंपदा विभागाने स्थगिती दिली आहे. येथील जिल्हा कार्यालय बंद करू नये यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या भेटीचे फलित म्हणून कार्यालय बंद ठेवण्यास शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इतिहासजमा होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय आता जिल्ह्याच्याच ठिकाणी सुरु राहणार असून या विभागात कार्यरत असलेल्या ४९ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर शासनाच्या स्थगिती आदेशामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात खारभूमी विभागाचे सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा कार्यालय आणि वेंगुर्ला, कणकवली व तळेरे येथे उपकार्यालये आहेत. या सर्व खारभूमी विभागात मिळून एकूण ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांसह १८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. ८ जून रोजी हे जिल्हा कार्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला होता. तसेच या विभागातील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना पुणे येथे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार कार्यालयाच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. तर उर्वरित कर्मचारी हे तीन उपकार्यालये आणि जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात येणार होते. शासनाच्या या निर्णयांमुळे या विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागात सुमारे १३२ खारभूमी बंधाऱ्याच्या योजना असून त्यातील १०८ बंधारे पूर्णत्वास गेले आहेत. तर २४ बंधारे पूर्णत्वाकडे आहेत. या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे ६ हजार १३२ हेक्टर क्षेत्र खारफुटीपासून वाचविण्यात आले आहे. सुरू झालेल्या या १०८ बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसह २४ प्रस्तावित बंधाऱ्यांचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हा कार्यालयाची नितांत गरज होती. मात्र शासनाने हे कायार्लाय बंद केल्याने आता या जिल्ह्याला रत्नागिरी येथे असलेल्या विभागीय कार्यालयावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे जनतेतून याबाबत संतापाची लाट उसळली होती. शासन आदेशान्वये हे कार्यालय बंद करण्याची पूर्ण तयारी या विभागाने केली होती. तसेच जिल्हा कार्यालयाचा फलकही काढण्यात आला होता. अचानक जिल्हा कार्यालय बंद करण्यात आल्याने जनतेची आणि कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय पाहता हे कार्यालय बंद करण्यात येऊ नये अशी मागणी या विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. दरम्यान दीपक केसरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत जिल्ह्याला हे कार्यालय आवश्यक असल्याचे पटवून देत हे कार्यालय बंद न करण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार शासनाच्या जलसंपदा विभागाने मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाला पुढील प्रशासकीय आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगिती दिली आहे. शासनाच्या या स्थगिती आदेशामुळे खारभूमीचे जिल्हा कार्यालय हे सिंधुदुर्गनगरीमध्येच सुरु राहणार आहे.