शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

खारभूमी कार्यालय जिल्ह्यातच राहणार

By admin | Updated: June 21, 2017 00:23 IST

स्थगितीच्या आदेशामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय बंद करण्यास शासनाच्या जलसंपदा विभागाने स्थगिती दिली आहे. येथील जिल्हा कार्यालय बंद करू नये यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या भेटीचे फलित म्हणून कार्यालय बंद ठेवण्यास शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इतिहासजमा होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय आता जिल्ह्याच्याच ठिकाणी सुरु राहणार असून या विभागात कार्यरत असलेल्या ४९ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर शासनाच्या स्थगिती आदेशामुळे विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात खारभूमी विभागाचे सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा कार्यालय आणि वेंगुर्ला, कणकवली व तळेरे येथे उपकार्यालये आहेत. या सर्व खारभूमी विभागात मिळून एकूण ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांसह १८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. ८ जून रोजी हे जिल्हा कार्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला होता. तसेच या विभागातील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना पुणे येथे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार कार्यालयाच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. तर उर्वरित कर्मचारी हे तीन उपकार्यालये आणि जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात येणार होते. शासनाच्या या निर्णयांमुळे या विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागात सुमारे १३२ खारभूमी बंधाऱ्याच्या योजना असून त्यातील १०८ बंधारे पूर्णत्वास गेले आहेत. तर २४ बंधारे पूर्णत्वाकडे आहेत. या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे ६ हजार १३२ हेक्टर क्षेत्र खारफुटीपासून वाचविण्यात आले आहे. सुरू झालेल्या या १०८ बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसह २४ प्रस्तावित बंधाऱ्यांचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हा कार्यालयाची नितांत गरज होती. मात्र शासनाने हे कायार्लाय बंद केल्याने आता या जिल्ह्याला रत्नागिरी येथे असलेल्या विभागीय कार्यालयावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे जनतेतून याबाबत संतापाची लाट उसळली होती. शासन आदेशान्वये हे कार्यालय बंद करण्याची पूर्ण तयारी या विभागाने केली होती. तसेच जिल्हा कार्यालयाचा फलकही काढण्यात आला होता. अचानक जिल्हा कार्यालय बंद करण्यात आल्याने जनतेची आणि कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय पाहता हे कार्यालय बंद करण्यात येऊ नये अशी मागणी या विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. दरम्यान दीपक केसरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत जिल्ह्याला हे कार्यालय आवश्यक असल्याचे पटवून देत हे कार्यालय बंद न करण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार शासनाच्या जलसंपदा विभागाने मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खारभूमी कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाला पुढील प्रशासकीय आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगिती दिली आहे. शासनाच्या या स्थगिती आदेशामुळे खारभूमीचे जिल्हा कार्यालय हे सिंधुदुर्गनगरीमध्येच सुरु राहणार आहे.