शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला खेळवतेय खंडाळा कॉलेजची वर्षा सावंत--यश रत्नकन्यांचे

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  -कनिष्ठ महाविद्यालयासाठी तीन ते साडेतीन किलोमीटरचे अंतर पायी तुडवत, ऊन - पावसातच नव्हे; तर कडाक्याच्या थंडीतही सरावासाठी मैदानावर वेळेवर उपस्थित राहणे हे जणू नित्याचे आहे. जीव ओतून खेळाचा सराव केला जात असल्यानेच वर्षा मोहन सावंत हिने आपला विशेष ठसा उमटवला आहे. खेळातील चमकदार कामगिरीमुळे सी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट खेळामुळेच वर्षा सध्या महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.रत्नागिरी शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने जिल्हा पातळीवर नव्हे; तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना लागणारे साहित्य व स्पर्धेसाठी जाण्या-येण्याचा लागणारा सर्व खर्च संस्थेने उचलला आहे. मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन या मुलींचे मनोबल उंचावते. वाटद मिरवणे केंद्रशाळेत वर्षाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आई मनीषा सावंत, वडील मोहन देमाजी सावंत शेतकरी असून, घराची परिस्थिती बेताची, घरातून कोणतेही मार्गदर्शन नसताना क्रिकेटची आवड राजेश जाधव व अर्चना खानविलकर यांच्यामुळे निर्माण झाली. खेड्यातील खेळाडू असतानाही खेळातील बारकावे, छोट्या मोठ्या टीप्स राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी कशा उपयोगी पडतील, याबाबतची माहिती राजेश जाधव व अर्चना खानविलकर करतात. शिक्षकांवर पालकांचा विश्वास असल्यामुळे मुलींना स्पर्धेकरिता पाठवतात. आपली मुलगी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचा वर्षाच्या वडिलांना अभिमान आहे.खेळताना खेळाडूचे लक्ष विजयाकडेच असते, किंबहुना ते असावे लागते. त्याप्रमाणे वर्षादेखील एकाग्र होऊन खेळ सादर करते. बेस्ट विकेट किपर (यष्टीरक्षक), उत्कृष्ट बॅट्समन, हाय स्कोर करून विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे. सामान्य शेतकऱ्याची मुलगी असल्याने तिला अन्य खेळाडूंप्रमाणे फिटनेससाठी व्यायाम, खाणे याकडे फारसे प्राधान्य देणे शक्य नाही. घरातून बांधून दिलेला भाजीपोळीचा डबा शिवाय दररोज महाविद्यालयासाठी करावी लागणारी पायपीट या तिच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, तिच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम शाळेचे शिक्षक, संस्थाचालक करत आहेत.वर्षाप्रमाणेच या कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींच्या संघाने क्रिकेटमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.या विद्यार्थिनींना राष्ट्रीय विशेष कोचच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या या संघाला चांगले प्रायोजक लाभले तर हा राष्ट्रीयस्तरावरील यशही खेचून आणण्याची ताकद या संघात आहे. परिस्थितीअभावी अनेक विद्यार्थिनींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते किंबहुना खेळही सुटतो. परिणामी या विद्यार्थिनींचे नुकसान होते. या विद्यार्थिनींचा खेळातील सहभाग व यश राहिले तर नक्कीच त्यांची परिस्थिती बदलू शकते.विविध स्पर्धासी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटविविध शहरातील खेळकोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, पंजाब, दिल्ली, फिरोजाबाद, गुजरात, मथुरा, राजकोट, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अमरावती.खेळातील यशबेस्ट विकेटकिपर (यष्टीरक्षक),उत्कृष्ट बॅट्समन हाय स्कोरक्रिकेट हाच श्वासखंडाळाहायस्कूल आणि महाविद्यालयात क्रिकेट शिकवणीसाठी क्रीडाशिक्षक राजेश जाधव आणि अर्चना खानविलकर मेहनत घेतात. ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू घडवण्याचे काम येथे सुरु आहे. अनेक समस्या पाचवीला पूजलेल्या असतानाही ज्ञानदाता गुरु आणि ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थिनी दोन्हीही कसोटीला उतरून क्रिकेट खेळतात. जणू क्रिकेट हाच त्यांचा श्वास आहे.