शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केसरकरांची वाटचाल स्वार्थासाठीच

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

परशुराम उपरकर : नारायण राणेंवरही केली टीका

कणकवली : नारायण राणे यांनी केलेले बंड थंड झाले आहे. केवळ दोन्ही मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दीपक केसरकर हे दहशतवादाच्या मुद्याचे राजकारण करण्याबरोबरच जनतेची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांची राजकीय वाटचाल ही वैयक्तिक स्वार्थासाठी सुरु असल्याची टीका मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.येथील संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात सन २००५ पासून दहशतवाद सुरु झाला आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संदेश पारकर यांना मारहाण झाली होती. तर उमेश कोरगांवकर यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला होता. या दोन्ही हल्ल्यानंतर दीपक केसरकर दोघांचीही विचारपूस करण्यासाठी गेलेले नाहीत. त्यांनी असे केले असते तर नारायण राणेंचा रोष त्यांनी ओढवून घेतला असता. त्यामुळेच केसरकर त्यावेळी शांत राहिले होते. सन २००५ च्या पोटनिवडणुकीत दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचा प्रचार केला होता. त्यावेळी राज्यभरातील शिवसैनिकांना सिंधुदुर्गात मारहाण होत होती. पण केसरकर हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहात होते. आपले आमदारकीचे तिकीट निश्चित करण्यासाठी राणेंच्या केबिनमध्ये ते बसून होते. त्यावेळी त्यांना हा दहशतवाद दिसला नाही.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आतापर्यंत वैभव नाईक यांच्याबाबत शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेचे वैभव असा उल्लेख करीत होते. आता केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते वैभव नाईकांना विसरले आहेत. सावंतवाडीतील सभेत वैभव नाईक यांचा त्यांनी उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेत नव्याने दाखल होणाऱ्यांना डोक्यावर घेतले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. सावंतवाडीतील केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी राज्यभरातील शिवसैनिकांची गर्दी होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील तुरळक मंडळी यावेळी उपस्थित होती. यावरून केसरकर यांचे पाठिराखे किती आहेत हेदेखील दिसून आले आहे. शिवसेनेत नव्याने दाखल झालेले माजी आमदार शंकर कांबळी हे काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी व आता पुन्हा शिवसेना असा प्रवास करीत आले आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधू का? असा प्रश्न विचारला. यावरून त्यांची किती पत घसरली आहे हे लक्षात येते, अशीही टीका उपरकर यांनी यावेळी केली. (वार्ताहर)केसरकरांनी खुनी माजी आमदाराचे नाव जाहीर करावेशिवसेना प्रवेशाच्या सभेत माजी आमदार दीपक केसरकर यांनी भाषणात जिल्ह्यातील काही खुनाचे आरोप असलेले माजी आमदार उघडपणे फिरत असल्याचा उल्लेख केला होता. केसरकरांनी पडद्यामागून राजकारण न करता उघडपणे राजकारण करावे व खुनी आरोपातील आमदाराचे नाव जाहीर करावे, असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. परशुराम उपरकर सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना हे उघडपणे राजकारण करत असते. शिवसेनेत खोटे बोलून राजकारण चालत नाही. खोट्यानाट्या घटना सांगून लोकांची सहानुभूती मिळणार नाही, अशी टीका यावेळी उपरकर यांनी केली. माजी आमदारांमध्ये शिवराम दळवी, राजन तेली यांच्यासह माझाही समावेश होतो. त्यामुळे पडद्यामागून नाव घेण्यापेक्षा केसरकरांनी उघडपणे ‘त्या’ आमदाराचे नाव घ्यावे. शिवराम दळवी, उमेश कोरगावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मंगळवारी केसरकर यांनी उल्लेख केला. मात्र, माझ्यावरील वेंगुर्ले येथे झालेल्या हल्ल्याचा त्यांनी उल्लेख का केला नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.