शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केसरकर सावंतवाडीतच राणेंकडून ‘चेकमेट’

By admin | Updated: August 31, 2015 00:25 IST

कारण-राजकारण : अपात्रतेच्या टांगत्या तलवारीने सदस्य घाबरले

अनंत जाधव-सावंतवाडी   काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आणून त्यांना चेकमेट करण्याची स्वप्न बघणारे पालकमंत्री दीपक केसरकर स्वत:च चेकमेट झाले आहेत. ज्या चार सदस्यांना ‘मातोश्री’ची वारी घडवून आणली होती, ते चारही सदस्य आता पुन्हा अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे काँग्रेसच्या गोटात दाखल होत पंचायत समितीवरचा काँग्रेस झेंडा शाबूत ठेवला आहे. मात्र, शिवसेनेच्या एका गटाने विरोध केला नसता, तर कदाचित हे चारही सदस्य शिवसेनेत गेले असते आणि अचानक पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले असते तर शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असती. त्यामुळे या चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील एक गट आपला विजयच मानत आहे. चार महिन्यांपूर्वी सावंतवाडी पंचायत समितीत बदलाचे वारे वाहू लागले होते. काँग्रेसच्या हातातून पंचायत समितीची सत्ता जाईल आणि पालकमंत्र्यांच्या तालुक्यात काँग्रेस नेते नारायण राणे चेकमेट होतील, असे वाटत होते. पण घडले उलटेच! पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात नारायण राणे यांनी चेकमेट करीत त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. काँग्रेसचे तीन सदस्य महेश सारंग, नारायण राणे व सुनयना कासकर, तर पूर्वीचे शिवसेनेचे व नंतर काँग्रेसला साथ देणारे विनायक दळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवशाही गट स्थापन करण्यात यावा, यासाठी अर्जही केला होता. पण याला काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडेच आव्हान दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दावे-प्रतिदावे चालले होते.दुसरीकडे काँग्रेसमधून आलेल्या चौघाही सदस्यांना शिवसेनेमध्ये हवे तसे स्थान मिळत नव्हते. एकंदरीत त्यांच्या पक्ष प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या काही समर्थकांनी या चौघाही सदस्यांना ‘मातोश्री’पर्यंत नेले खरे; पण नंतर त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र उमटल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावर कोणीच भाष्य केले नाही. पण शिवसेनेचा एक गट या चौघांच्याही पक्षप्रवेशाला तीव्र विरोध करीत होता. त्यांनी या चौघांची कुंडलीच पक्ष नेतृत्त्वाकडे पोहोचवली होती, तर दुसरा गट या चौघाही सदस्यांच्या बाजूचा होता. सेनेतील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे या सदस्यांना धड शिवसेनेत असल्याचे वाटत नव्हते.शिवशाही गट स्थापन करून शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या चार सदस्यांना कायदेशीर प्रक्रियेत अडकवण्यास काँग्रेसने सुरूवात केली होती. नवीन कायद्याप्रमाणे हे चारही सदस्य एक तृतीयांश सदस्य आपल्या बरोबर घेऊन येऊ शकत नसल्याने अपात्र होणार होते. याची कुणकुण या सदस्यांना लागताच त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांना साद घालत पुन्हा काँग्रेसवासी झाले. त्यामुळे पंचायत समितीवरचे राजकीय स्थित्यंत्तर वाचले आणि पुन्हा पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात ‘चेकमेट’ करण्यात यश आले. दुसरीकडे या चार सदस्यांना शिवसेनेने प्रवेश दिला असता, तर अल्पवधीतच शिवसेनेच्या नेतृत्त्वाची नाचक्कीच झाली असती. कारण काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती हिसकावून घेतली, असा जयघोष सुरू करण्यात चार सदस्यांचे समर्थक पुढे होते. अपात्रतेच्या कारवाईमुळे हे सदस्य पुन्हा काँग्रेसवासी झाले असते. मग हा जयघोष करणारे उघडे पडणार होते.‘मातोश्री’ वारी केलेले सदस्य काँग्रेसच्या आश्रयाला.सदस्यांना विरोध करणारे आनंदात.चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील गट मानतोय आपलाच विजय.नारायण राणे यांना घातली साद.