शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

केसरकर सावंतवाडीतच राणेंकडून ‘चेकमेट’

By admin | Updated: August 31, 2015 00:25 IST

कारण-राजकारण : अपात्रतेच्या टांगत्या तलवारीने सदस्य घाबरले

अनंत जाधव-सावंतवाडी   काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आणून त्यांना चेकमेट करण्याची स्वप्न बघणारे पालकमंत्री दीपक केसरकर स्वत:च चेकमेट झाले आहेत. ज्या चार सदस्यांना ‘मातोश्री’ची वारी घडवून आणली होती, ते चारही सदस्य आता पुन्हा अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे काँग्रेसच्या गोटात दाखल होत पंचायत समितीवरचा काँग्रेस झेंडा शाबूत ठेवला आहे. मात्र, शिवसेनेच्या एका गटाने विरोध केला नसता, तर कदाचित हे चारही सदस्य शिवसेनेत गेले असते आणि अचानक पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले असते तर शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असती. त्यामुळे या चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील एक गट आपला विजयच मानत आहे. चार महिन्यांपूर्वी सावंतवाडी पंचायत समितीत बदलाचे वारे वाहू लागले होते. काँग्रेसच्या हातातून पंचायत समितीची सत्ता जाईल आणि पालकमंत्र्यांच्या तालुक्यात काँग्रेस नेते नारायण राणे चेकमेट होतील, असे वाटत होते. पण घडले उलटेच! पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात नारायण राणे यांनी चेकमेट करीत त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. काँग्रेसचे तीन सदस्य महेश सारंग, नारायण राणे व सुनयना कासकर, तर पूर्वीचे शिवसेनेचे व नंतर काँग्रेसला साथ देणारे विनायक दळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवशाही गट स्थापन करण्यात यावा, यासाठी अर्जही केला होता. पण याला काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडेच आव्हान दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दावे-प्रतिदावे चालले होते.दुसरीकडे काँग्रेसमधून आलेल्या चौघाही सदस्यांना शिवसेनेमध्ये हवे तसे स्थान मिळत नव्हते. एकंदरीत त्यांच्या पक्ष प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या काही समर्थकांनी या चौघाही सदस्यांना ‘मातोश्री’पर्यंत नेले खरे; पण नंतर त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र उमटल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावर कोणीच भाष्य केले नाही. पण शिवसेनेचा एक गट या चौघांच्याही पक्षप्रवेशाला तीव्र विरोध करीत होता. त्यांनी या चौघांची कुंडलीच पक्ष नेतृत्त्वाकडे पोहोचवली होती, तर दुसरा गट या चौघाही सदस्यांच्या बाजूचा होता. सेनेतील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे या सदस्यांना धड शिवसेनेत असल्याचे वाटत नव्हते.शिवशाही गट स्थापन करून शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या चार सदस्यांना कायदेशीर प्रक्रियेत अडकवण्यास काँग्रेसने सुरूवात केली होती. नवीन कायद्याप्रमाणे हे चारही सदस्य एक तृतीयांश सदस्य आपल्या बरोबर घेऊन येऊ शकत नसल्याने अपात्र होणार होते. याची कुणकुण या सदस्यांना लागताच त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांना साद घालत पुन्हा काँग्रेसवासी झाले. त्यामुळे पंचायत समितीवरचे राजकीय स्थित्यंत्तर वाचले आणि पुन्हा पालकमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात ‘चेकमेट’ करण्यात यश आले. दुसरीकडे या चार सदस्यांना शिवसेनेने प्रवेश दिला असता, तर अल्पवधीतच शिवसेनेच्या नेतृत्त्वाची नाचक्कीच झाली असती. कारण काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या ताब्यातील पंचायत समिती हिसकावून घेतली, असा जयघोष सुरू करण्यात चार सदस्यांचे समर्थक पुढे होते. अपात्रतेच्या कारवाईमुळे हे सदस्य पुन्हा काँग्रेसवासी झाले असते. मग हा जयघोष करणारे उघडे पडणार होते.‘मातोश्री’ वारी केलेले सदस्य काँग्रेसच्या आश्रयाला.सदस्यांना विरोध करणारे आनंदात.चौघांनाही विरोध करणारा शिवसेनेतील गट मानतोय आपलाच विजय.नारायण राणे यांना घातली साद.