शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

शेवंड टिकवण्यासाठी ‘त्यांची’ दहा वर्षे धडपड

By admin | Updated: March 23, 2015 00:38 IST

अस्लम अकबानी : हर्णै बंदरात माशांची आवक वाढली

शिवाजी गोरे - दापोली -समुद्रात सरसकट मासेमारी करुन अनेक जातीच्या माशांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यात येत असल्याने माशांच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. ज्यांचा उदरनिर्वाह या मासेमारीवर चालतो, त्यांच्यामध्येच ही जागृती करण्यासाठी एक मासळी व्यावसायिकच पुढे आला आहे. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या शेवंडची जात नष्ट होऊ नये, यासाठी मासळी व्यावसायिक अस्लम अकबानी यांनी पुढाकार घेतला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात सापडलेल्या शेवंडची पिल्ले आणि मादी विकत घेऊन ती परत समुद्रात सोडण्याचे व्रत गेली १० वर्षे ते जोपासत आहेत.परकीय चलन मिळवून देणारे शेवंड हर्णै बंदरात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याच बंदरात शेवंडची सर्वाधिक आवक आहे. या बंदरातील शेवंडची सरसकट मासेमारी केली जात होती. त्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे शेवंड नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु या बंदरातील मासळी व्यावसायिक माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी शेवंडच्या शाश्वत मासेमारीसाठी पुढाकार घेतला. मच्छिमारांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ते मच्छिमारांकडून शेवंड खरेदी करतात आणि त्यातून छोटी पिले व मादीला जीवदान देतात. सलग दहा वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. हर्णै बंदरात शेवंडची मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना १० वर्षांपासून जागृत करण्याचे काम अकबानी यांच्याकडून सुरु आहे. जाळ्यात सरसकट शेवंड आला तरीही सरसकट मासेमारी केली जात नाही. शेवंडची मादी जगली तरच भविष्यात शेवंडची उत्पत्ती वाढेल, अशा प्रकारचे महत्व ते मच्छिमारांना पटवून देत आहेत.भविष्यात शेवंड नामशेष होऊ नये, शेवंड जाळ्यात पकडल्यानंतर तो दोन दिवससुद्धा जिवंत राहू शकतो. समुद्राच्या पाण्यातील शेवंडला गोड्या पाण्यात टाकल्यावर तो मरतो. शेवंडला खूप मागणी आहे. परंतु शेवंडची मासेमारी खूप कमी मच्छिमार करतात. जाळ्यात पकडून आणलेला शेवंड जिवंत असतो. काहीवेळा मादीच्या पोटात अंडी व पिलेसुद्धा असतात. अशा मादीला मारल्यास खूप मोठे नुकसान होते. छोटी पिलेसुद्धा मोठी होण्याआधीच जाळ्यात येतात. त्या पिलांमध्येसुद्धा मादी असू शकते. त्यामुळे ३०० ग्रामपेक्षा कमी वजनाच्या पिलंना जीवदान देण्यात येते.हर्णै बंदरातील मच्छिमारांत शाश्वत मासेमारीसंदर्भात जागृती करण्यात येत असून, समुद्रात सापडलेले छोटे मासे सोडून देण्यात येत आहेत. खेकड्यांची छोटी पिलंही पकडली जात नाही. खेकड्यांच्या मादीलाही सोडून दिले जाते. कमी दर्जाची मासळी समुद्रात सोडून दिली जाते.शेवंडची एक मादी हजारो अंडी देते. ती अंडी जगण्याचे प्रमाण कमी आहे. शाश्वत मासेमारीतून मादीचा बचाव झाल्यास त्यांची संख्या वाढण्यास मदत होते. समुद्रात मासेमारी करतात, मादी जाळ्यात अडकल्यास तिला पुन्हा समुद्रात सोडावे, असे सांगितले जाते.