शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कौन बनेगा कणकवली ‘नगराध्यक्ष’

By admin | Updated: October 6, 2015 00:41 IST

काँग्रेस अंतर्गत दोन गटांमध्ये चुरस : सुविधा साटम, माधुरी गायकवाड यांच्यात लढाई

कणकवली : कणकवली नगराध्यक्ष पदासाठी सध्या रस्सीखेच सुरु असून काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येच दोन गट पडले आहेत. काँग्रेसकडून सुविधा साटम तर संदेश पारकर गटाकडून माधुरी गायकवाड़ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गटांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून राजकीय डावपेचांना वेग आला आहे. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार याबाबत आता नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.कणकवली नगराध्यक्ष पदाचा अडीच वषार्चा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याच बरोबर उपनगराध्यक्ष निवड ही होणार आहे. मात्र पूर्वीचे सहकारी असलेले आणि आता एकमेकात वितुष्ट आलेले संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून आपला नगराध्यक्ष बसावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे. काँग्रेस विरुद्ध संदेश पारकर गट असे काहीसे वातावरण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे.३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पासूनच विविध घटना घडत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरविण्यापासून दोन्ही गट एकमेकांशी रस्सीखेच करीत असल्याचे दिसून येत आहे. या संघर्षातूनच नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटांनी आपले वेगवेगळे उमेदवार उभे केले. तर आपल्याला विश्वासात न घेतल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण तटस्थ राहणार असल्याचे विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी पारकर गटाकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राजश्री धुमाळे यांचे समर्थन जरी पारकर गटाला मिळाले तरी शिवसेनेचे तीन नगरसेवक मिळून फक्त आठच सदस्य त्यांच्याकडे होणार आहेत. बहुमतासाठी त्यांना आणखीन एका नगरसेवकाच्या समर्थनाची गरज भासणार आहे. त्यामुळे तो नेमका नगरसेवक कोण असेल याबाबतही शहरातील नागरिकांकडून तर्कवितर्क करण्यात येत आहेत.काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करण्यात येणार ? किवा विद्यमान नगरसेवक समीर नलावडे यानाच पुन्हा संधी दिली जाणार का? याबाबतही नागरिकांकडून आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे. (वार्ताहर)...तर निवडणूक अटळआता ७ आॅक्टोबर रोजी या दोन अर्जांपैकी एक अर्ज मागे घेतला गेला नाही तर ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक अटळ आहे. त्यामुळे १७ नगरसेवकांमधुन ९ नगरसेवकांचे बहुमत मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे निवडीकडे लक्ष लागले आहे.