शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कौन बनेगा कणकवली ‘नगराध्यक्ष’

By admin | Updated: October 6, 2015 00:41 IST

काँग्रेस अंतर्गत दोन गटांमध्ये चुरस : सुविधा साटम, माधुरी गायकवाड यांच्यात लढाई

कणकवली : कणकवली नगराध्यक्ष पदासाठी सध्या रस्सीखेच सुरु असून काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येच दोन गट पडले आहेत. काँग्रेसकडून सुविधा साटम तर संदेश पारकर गटाकडून माधुरी गायकवाड़ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही गटांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून राजकीय डावपेचांना वेग आला आहे. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार याबाबत आता नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.कणकवली नगराध्यक्ष पदाचा अडीच वषार्चा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याच बरोबर उपनगराध्यक्ष निवड ही होणार आहे. मात्र पूर्वीचे सहकारी असलेले आणि आता एकमेकात वितुष्ट आलेले संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही गटाकडून आपला नगराध्यक्ष बसावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे. काँग्रेस विरुद्ध संदेश पारकर गट असे काहीसे वातावरण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाले आहे.३ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पासूनच विविध घटना घडत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरविण्यापासून दोन्ही गट एकमेकांशी रस्सीखेच करीत असल्याचे दिसून येत आहे. या संघर्षातूनच नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटांनी आपले वेगवेगळे उमेदवार उभे केले. तर आपल्याला विश्वासात न घेतल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण तटस्थ राहणार असल्याचे विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी पारकर गटाकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राजश्री धुमाळे यांचे समर्थन जरी पारकर गटाला मिळाले तरी शिवसेनेचे तीन नगरसेवक मिळून फक्त आठच सदस्य त्यांच्याकडे होणार आहेत. बहुमतासाठी त्यांना आणखीन एका नगरसेवकाच्या समर्थनाची गरज भासणार आहे. त्यामुळे तो नेमका नगरसेवक कोण असेल याबाबतही शहरातील नागरिकांकडून तर्कवितर्क करण्यात येत आहेत.काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करण्यात येणार ? किवा विद्यमान नगरसेवक समीर नलावडे यानाच पुन्हा संधी दिली जाणार का? याबाबतही नागरिकांकडून आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे. (वार्ताहर)...तर निवडणूक अटळआता ७ आॅक्टोबर रोजी या दोन अर्जांपैकी एक अर्ज मागे घेतला गेला नाही तर ८ आॅक्टोबर रोजी निवडणूक अटळ आहे. त्यामुळे १७ नगरसेवकांमधुन ९ नगरसेवकांचे बहुमत मिळविण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यामुळे निवडीकडे लक्ष लागले आहे.