शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘कस्तुरीरंगन’ अहवालाचा केंद्र फेरविचार करणार : राऊत

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाही

सावंतवाडी : केंद्रशासन कस्तुरीरंगन अहवालाचा फेरविचार करणार असून, त्याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडे अहवाल मागितला आहे. पण शासनाने हा अहवाल अद्याप दिला नसल्याने पुढील कारवाई केंद्र सरकारने केली नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, संपर्कप्रमुख शैलेश परब, रूपेश राऊळ, एकनाथ नारोजी, शब्बीर मणियार यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालाप्रमाणे आता कारवाई सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईस विरोध आहे. केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाबाबत फेरविचार करण्याचे ठरविले असून, त्यांनी तशाप्रकारे महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर अहवाल मागितला. पण महाराष्ट्राने हा अहवाल केंद्राला दिला नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्कालीन पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माळीण गावात जी दुर्घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने डोंगराच्या पायथ्याच्या गावांचा सर्व्हे सुरू केला आहे. येथील कळणे व साटेली मायनिंगला तीव्र विरोध असून तेथील ग्रामस्थांच्या मागे कायम उभे राहू, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाहीइंदापूरपासून झारापपर्यंतच्या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यानुसार राजापूर पर्यंतचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता त्यापुढील टप्प्याचे भूसंपादन लवकरात लवकर सुरू केले जाईल. या रस्त्यावर इंदापूरपर्यंत एक टोल असेल मात्र, इंदापूरनंतर झारापपर्यंत एकही टोल असणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. तसे नव्या नियमात नोंद आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे. इंदापूर पर्यंतचा रस्ता हा बीओटी तत्त्वावर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.-माजी आमदार परशुराम उपरकर यांना आपण फक्त सज्जन असल्याचा भास होतो. त्यांची ही चिवचिव फुकटची आहे, अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी केली आहे.