शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘कस्तुरीरंगन’ अहवालाचा केंद्र फेरविचार करणार : राऊत

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाही

सावंतवाडी : केंद्रशासन कस्तुरीरंगन अहवालाचा फेरविचार करणार असून, त्याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडे अहवाल मागितला आहे. पण शासनाने हा अहवाल अद्याप दिला नसल्याने पुढील कारवाई केंद्र सरकारने केली नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, संपर्कप्रमुख शैलेश परब, रूपेश राऊळ, एकनाथ नारोजी, शब्बीर मणियार यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालाप्रमाणे आता कारवाई सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईस विरोध आहे. केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाबाबत फेरविचार करण्याचे ठरविले असून, त्यांनी तशाप्रकारे महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर अहवाल मागितला. पण महाराष्ट्राने हा अहवाल केंद्राला दिला नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्कालीन पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माळीण गावात जी दुर्घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने डोंगराच्या पायथ्याच्या गावांचा सर्व्हे सुरू केला आहे. येथील कळणे व साटेली मायनिंगला तीव्र विरोध असून तेथील ग्रामस्थांच्या मागे कायम उभे राहू, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाहीइंदापूरपासून झारापपर्यंतच्या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यानुसार राजापूर पर्यंतचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता त्यापुढील टप्प्याचे भूसंपादन लवकरात लवकर सुरू केले जाईल. या रस्त्यावर इंदापूरपर्यंत एक टोल असेल मात्र, इंदापूरनंतर झारापपर्यंत एकही टोल असणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. तसे नव्या नियमात नोंद आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे. इंदापूर पर्यंतचा रस्ता हा बीओटी तत्त्वावर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.-माजी आमदार परशुराम उपरकर यांना आपण फक्त सज्जन असल्याचा भास होतो. त्यांची ही चिवचिव फुकटची आहे, अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी केली आहे.