शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुका हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

स्वच्छ भारत अभियान : १ आॅक्टोबरला उत्सवी कार्यक्रम

कणकवली : तालुक्यातील ६३ ही ग्रामपंचायतींमधील गावांत कुटुंबागणिक शौचालयांची उपलब्धता झाल्याने कणकवली तालुका हागंदारीमुक्त झाला आहे. येत्या १ आॅक्टोबर रोजी त्यानिमित्त उत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामविस्तार अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाअभावी उघड्यावर शौचाला जाणाऱ्या प्रत्येकासाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ज्या तालुक्यांनी हे उद्दीष्ट प्राप्त केले आहे. त्यांना हागंदारीमुक्त तालुका घोषित केले जाते. कणकवली तालुक्यातील २०१२ च्या सर्वेक्षणावर आधारित ६३ ग्रामपंचायतींमधून ४३३५ शौचालये उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट होते. शेवटच्या टप्प्यात सात ग्रामपंचायतींमध्ये शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम बाकी होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता यासंदर्भातील आॅनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत ही माहिती अपडेट होईल. येत्या काळात शासनाच्या समितीकडून तालुक्यातील हागंदारीमुक्तीच्या कामाची पाहणी होईल. १ आॅक्टोबर रोजी हागंदारीमुक्तीच्या उत्सवी कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती कार्यालयाकडून सकाळी ९ वाजता रॅलीचा प्रारंभ होईल. या रॅलीत विद्यार्थ्यांसह, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांसह ढोलपथक, पथनाटय आणि चित्ररथ असतील. पंचायत समितीपासून डीपी रोडवरून भगवती मंगल कार्यालयाकडे मुख्य कार्यक्रमस्थळी रॅलीचा समारोप होईल. भगवती मंगल कार्यालयातील कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषदेतील विशेष समित्यांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, खातेप्रमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हागंदारीमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार होणार आहे, असे आस्था सर्पे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सार्वजनिक शौचालयांसाठी प्रयत्नगावातील रहिवाशांव्यतिरीक्त गावात परगावातून तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या मजूरवर्ग आदींना शौचालयाची व्यवस्था नसल्यास ते उघड्यावर शौचास जातात. त्यांचाही विचार करण्यात येत सार्वजनिक शौचालयांसाठी प्रस्ताव मागवण्यात येतील.असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बोलताना सांगितले.