शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

कणकवली तालुका हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

स्वच्छ भारत अभियान : १ आॅक्टोबरला उत्सवी कार्यक्रम

कणकवली : तालुक्यातील ६३ ही ग्रामपंचायतींमधील गावांत कुटुंबागणिक शौचालयांची उपलब्धता झाल्याने कणकवली तालुका हागंदारीमुक्त झाला आहे. येत्या १ आॅक्टोबर रोजी त्यानिमित्त उत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामविस्तार अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाअभावी उघड्यावर शौचाला जाणाऱ्या प्रत्येकासाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ज्या तालुक्यांनी हे उद्दीष्ट प्राप्त केले आहे. त्यांना हागंदारीमुक्त तालुका घोषित केले जाते. कणकवली तालुक्यातील २०१२ च्या सर्वेक्षणावर आधारित ६३ ग्रामपंचायतींमधून ४३३५ शौचालये उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट होते. शेवटच्या टप्प्यात सात ग्रामपंचायतींमध्ये शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम बाकी होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता यासंदर्भातील आॅनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत ही माहिती अपडेट होईल. येत्या काळात शासनाच्या समितीकडून तालुक्यातील हागंदारीमुक्तीच्या कामाची पाहणी होईल. १ आॅक्टोबर रोजी हागंदारीमुक्तीच्या उत्सवी कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती कार्यालयाकडून सकाळी ९ वाजता रॅलीचा प्रारंभ होईल. या रॅलीत विद्यार्थ्यांसह, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांसह ढोलपथक, पथनाटय आणि चित्ररथ असतील. पंचायत समितीपासून डीपी रोडवरून भगवती मंगल कार्यालयाकडे मुख्य कार्यक्रमस्थळी रॅलीचा समारोप होईल. भगवती मंगल कार्यालयातील कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषदेतील विशेष समित्यांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, खातेप्रमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हागंदारीमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार होणार आहे, असे आस्था सर्पे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सार्वजनिक शौचालयांसाठी प्रयत्नगावातील रहिवाशांव्यतिरीक्त गावात परगावातून तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या मजूरवर्ग आदींना शौचालयाची व्यवस्था नसल्यास ते उघड्यावर शौचास जातात. त्यांचाही विचार करण्यात येत सार्वजनिक शौचालयांसाठी प्रस्ताव मागवण्यात येतील.असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बोलताना सांगितले.