शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

कणकवली, रत्नागिरीत ‘सरकते जिने’

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

दोन महिन्यात पूर्ण होणार : कोकण मार्गावरील पहिला ट्रॅव्हलेटर रत्नागिरीत !

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येत्या दोन ते तीन महिन्यांत ‘ट्रॅव्हलेटर’ यंत्रणा (पायरीविरहित सरकता जिना) बसविली जाणार आहे. या स्वयंचलित यंत्रणेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील प्रवाशांची जिना चढण्यासाठी होणारी दमछाक थांबणार आहे. कोकण रेल्वेमार्गावरील ही पहिलीच ‘ट्रॅव्हलेटर’ यंत्रणा ठरणार असून, त्यासाठी १८ लाखांचा खर्च येणार आहे. रत्नागिरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ वर महिन्याभरापूर्वीच ४० लाखांच्या पायऱ्या असलेल्या सरकत्या जिन्याचे (एक्सलेटर) काम सुरू झाले आहे. कणकवली, मडगाव येथेही असे एक्सलेटर उभारले जाणार आहेत. रत्नागिरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर २ वरील एक्सलेटरचे काम घेतलेल्या ठेकेदारानेच प्लॅटफॉर्म नंबर १ वरील ट्रॅव्हलेटरचे काम स्वीकारले असून, येत्या दोन महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रात रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेकडे विशेष लक्ष दिले असून, प्रत्येक स्थानकावर कोणत्या सुविधा हव्यात, याचा अभ्यास केल्यानंतर आता त्याची कार्यवाही केली जात आहे. त्याअंतर्गत रेल्वे स्थानकांवर कोकण मेवा स्टॉल्स सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता एक्सलेटर व ट्रॅव्हलेटर बसविण्यात येत आहेत. रत्नागिरी हे कोकण रेल्वेमार्गावरील मध्यवर्ती व महत्त्वाचे असे स्थानक आहे; मात्र हे स्थानक सखल भागात असल्याने दोन जिने खाली उतरून प्लॅटफॉर्मवर जावे लागते. उतरताना फारसा त्रास होत नसला, तरी गाडीतून उतरल्यावर हाती सामानाचे ओझे घेऊन हे दोन जिने चढून जाताना प्रवाशांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. प्लॅटफॉर्म नंबर १ वर अपंग, वृद्धांसाठी उदवाहन (लिफ्ट)ची सोय करण्यात आली आहे; मात्र सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबाबत याआधी विचारच झाला नव्हता. आता प्रभू यांच्या व्हिजनमधून कोकण रेल्वेमार्गावर अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पत्राशेडची लांबी वाढवा...रत्नागिरी हे स्थानक मोठे असले तरी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पत्र्याची शेड निम्म्या प्लॅटफॉर्म अंतरापर्यंत उभारण्यात आली आहे. ती पूर्णत: उभारावी व प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर अत्यंत अपुरी असलेली पत्र्याची शेडही पूर्ण प्लॅटफॉर्मवर उभारण्यात यावी. रत्नागिरी स्थानकावरील प्रवाशांची नेहमीची वर्दळ पाहता पावसाळी व उन्हाळी सुरक्षेसाठी पत्र्याची शेड पूर्णत: उभारावी तसेच मार्गावरील अन्य स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवरही पत्राशेड पुरेशा प्रमाणात उभाराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.