शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कणकवलीत मुलगा बुडताना वाचला

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

गणेश विसर्जनासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करणे गरजेचे

कणकवली : गुरूवारी गौरी गणपतींचे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. ग्रामीण भागात विसर्जनासाठी स्थानिक मंडळीच हातभार लावतात. शहरात गणेश विसर्जनासाठी हौशी मुले आपला जीव धोक्यात घालत आहेत. नगरपंचायतीकडून विसर्जनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गणपती सान्यावर जानवली नदीत उतरलेला सुमारे दहा वर्षे वयाचा मुलगा बुडता बुडता वाचला. मूर्ती विसर्जित करून परतताना तो बुडताना काहींनी पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूला विसर्जन करत असलेल्या इतर मुलांनी त्याला पाण्याबाहेर काढले. यावेळी कणकवली स्थानकाचे पोलीसही बंदोबस्तासाठी घटनास्थळी उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने हौशी पोहणारे विसर्जनासाठी पाण्यात उतरतात. या बदल्यात त्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्यांकडून पैसेही मिळतात. नगरपंचायतीने गणपती साना आणि हायमास्टची उभारणी केली आहे. मात्र, पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जनावेळी गणपती सान्यावर हायमास्ट दिवेही लागलेले नव्हते. शहरात गणपती साना, मराठा मंडळ, कनकनगर बंधाऱ्यानजीक, टेंबवाडी आदी ठिकाणी जानवली आणि गडनदी पात्रात गणेश विसर्जन केले जाते. मात्र, कोणत्याही ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. नगरपंचायतीकडून विसर्जनस्थळी किमान एक कर्मचारी विसर्जनाच्या व्यवस्थापनासाठी ठेवणे गरजेचे आहे. महसूल विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लाईफ जॅकेटस आणि बोट उपलब्ध आहे. या साधनांचा गणेश विसर्जनावेळी वापर केला जाऊ शकतो. अनंत चतुर्दशीला शहरातील गणेश विसर्जन मोठ्या संख्येने केले जाते. त्यावेळी फक्त सुरक्षा न पुरवता दीड, पाच, सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठीही सुरक्षा व्यवस्था पुरवणे तेवढेच गरजेचे आहे. (प्रतिनिधी)