शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कणकवलीत मुलगा बुडताना वाचला

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

गणेश विसर्जनासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करणे गरजेचे

कणकवली : गुरूवारी गौरी गणपतींचे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. ग्रामीण भागात विसर्जनासाठी स्थानिक मंडळीच हातभार लावतात. शहरात गणेश विसर्जनासाठी हौशी मुले आपला जीव धोक्यात घालत आहेत. नगरपंचायतीकडून विसर्जनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गणपती सान्यावर जानवली नदीत उतरलेला सुमारे दहा वर्षे वयाचा मुलगा बुडता बुडता वाचला. मूर्ती विसर्जित करून परतताना तो बुडताना काहींनी पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूला विसर्जन करत असलेल्या इतर मुलांनी त्याला पाण्याबाहेर काढले. यावेळी कणकवली स्थानकाचे पोलीसही बंदोबस्तासाठी घटनास्थळी उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने हौशी पोहणारे विसर्जनासाठी पाण्यात उतरतात. या बदल्यात त्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्यांकडून पैसेही मिळतात. नगरपंचायतीने गणपती साना आणि हायमास्टची उभारणी केली आहे. मात्र, पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जनावेळी गणपती सान्यावर हायमास्ट दिवेही लागलेले नव्हते. शहरात गणपती साना, मराठा मंडळ, कनकनगर बंधाऱ्यानजीक, टेंबवाडी आदी ठिकाणी जानवली आणि गडनदी पात्रात गणेश विसर्जन केले जाते. मात्र, कोणत्याही ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. नगरपंचायतीकडून विसर्जनस्थळी किमान एक कर्मचारी विसर्जनाच्या व्यवस्थापनासाठी ठेवणे गरजेचे आहे. महसूल विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लाईफ जॅकेटस आणि बोट उपलब्ध आहे. या साधनांचा गणेश विसर्जनावेळी वापर केला जाऊ शकतो. अनंत चतुर्दशीला शहरातील गणेश विसर्जन मोठ्या संख्येने केले जाते. त्यावेळी फक्त सुरक्षा न पुरवता दीड, पाच, सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठीही सुरक्षा व्यवस्था पुरवणे तेवढेच गरजेचे आहे. (प्रतिनिधी)