शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

सिंधुदुर्गात कला अकादमीच्या धर्तीवर कलादालन

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

दीपक केसरकरांची घोषणा : अण्णा भाऊ साठे संमेलनाचा सावंतवाडीत समारोप

सावंतवाडी : सिंधुुदुर्ग जिल्ह्यात गोवा कला अकादमीच्या धर्तीवर कलादालन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. ते सावंतवाडी येथे भरविण्यात आलेल्या सहाव्या राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी संमेलन अध्यक्ष सतीश काळसेकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कॉ. गोविंद पानसरे, सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष बबन साळगावकर, लेखक प्रवीण बांदेकर, जयप्रकाश सावंत, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडीला इतिहास आहे तो येथील कलेचा. राजघराण्यांनी नेहमीच सावंतवाडीतील कलाकारप्रेमींना आपलेसे केले आहे. तीच परंपरा आजही कायम जोपासण्यात आली असून, सावंतवाडी नगरपालिका तसेच काम करीत आहे.राज्य सरकार हे नेहमीच कलाकारांच्या पाठीशी राहिले असून, गोवा कला अकादमीच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कलादालन करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी त्यांनी घाटी व कोकणी वादावर मत मांडताना सांगितले की, घाटावरचे शिक्षक कोकणात येतात, पण येथील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले असल्याचे स्पष्ट करत तेथे अतिरिक्त झालेले शिक्षक कोकणात पाठवले जातात, असा टोलाही उपस्थितांना लगावला.संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांनी सांगितले की, सावंतवाडीत अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाप्रमाणेच कविसंमेलनही भरविले जावे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. संमेलनाचे उद्घाटक सुनीलकुमार लवटे यांनी विविध अंगांनी कोकणचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. यात कोकणातील लोक साधेभोळे म्हटले जातात, पण तेवढेच ते हुशार असतात, असे मत मांडले. मी अनेक शब्द हे कोकणातून उचलले असून, त्यांचे चांगले अनुभव मला येतात. याचे एक उदाहरण म्हणून त्यांनी ‘मी मुलांना पोरं म्हणत असे, पण माझ्या कोकणातील मित्रांमुळेच पोरं न म्हणता मुलं म्हणू लागलो. यातून पोरं कोणाला म्हणतात, मुलं कोणाला म्हणतात याचा अर्थ त्यांनी पटवून दिला’, असे सांगत कोकणच्या माणसाकडे संस्कृतपणा असतो, असे स्पष्ट केले.डॉ. गोविंद काजरेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण बांदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सावंतवाडीत खांडेकर व साठे स्मारक होणारसावंतवाडीत वि. स. खांडेकर तसेच अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले. असा ठराव संमेलनात मांडला.घाट म्हणजे युरोप आणि कोकण म्हणजे भारतसंमेलनाचे उद्घाटक सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात कोकण म्हणजे भारत, तर घाट म्हणजे युरोप असे सांगत घाटावर कंटाळा आला तर कोकणात येण्याचे भाग्य वेगळेच असते. कोकणात जास्तीत जास्त समृद्धी ही घाटावरच्या शिक्षकांनीच आणल्याचे लवटे यांनी सांगितले.