शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

किनळोस-माऊली मंदिरानजीक दरड कोसळली

By admin | Updated: August 15, 2016 00:16 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : वझर धबधब्याच्या दुरूस्तीची प्रतिक्षाच

कडावल : किनळोस येथील श्री माऊली मंदिर येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य लक्षात घेता पर्यटन विकासनिधीतून मंदिर परिसर तसेच नजीक असलेल्या वझर धबधब्याचे सुशोभिकरण करण्यात यावे तसेच पर्यटनविषयक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कोसळलेली दरड हटवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. येथील श्री माऊली मंदिर परिसराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. मंदिराच्या सर्व बाजूस असलेल्या विस्तीर्ण डोंगररांगा आणि जवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे. मंदिरापासून काही अंतरावर या ओढ्यावरच निसर्गरम्य असा वझर धबधबा आहे. अतिशय उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यामुळे परिसराला पर्यटनविषयक महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या पर्यटनविषयक विकासाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन विकासनिधीतून अनेक धार्मिक स्थळांचे सुशोभिकरण करून तेथे आधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. मंदिर परिसर व वझर धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित केल्यास निसर्गाचे लेणे लाभलेल्या किनळोस गावाला पर्यटनाचा गाव अशी ओळख मिळणार आहे. रोजगार क्षमतेमध्ये वाढ होऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी परिसराचा नियोजनबद्ध विकास आराखडा करून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. गावाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास निधीतून मंदिर परिसर व वझर धबधब्याचे सुशोभिकरण करण्यात यावे, येथे पर्यटनविषयक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व कोसळलेली दरड हटवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)