शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांना न्याय द्या : गणपत चव्हाण

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

गिरण्यांची १८० एकर जमीन पंतप्रधानांशी चर्चा करून उपलब्ध करून दिल्यास त्यावर ६० ते ७० हजार घरे बांधणे शक्य असल्याचे सांगितले.

कणकवली : आघाडी शासनाच्या मालकधार्जिण्या धोरणामुळे गिरणी कामगारांची ससेहोलपट झाली आहे. हक्काचे मोफत घर मिळविण्यासाठी हा कामगार गेली दहा-बारा वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहे. या गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, या मागणीचे निवेदन गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष गणपत चव्हाण यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक संस्था फेडरेशन आणि गोपुरी आश्रमाच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मेळाव्यात हे निवेदन मंत्री प्रभू यांना देण्यात आले. या निवेदनासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी स्वतंत्रपणे निवेदन देऊन याप्रश्नी पंतप्रधानांशी चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये संयुक्त महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीमध्ये गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, यापूर्वीच्या आघाडी शासनाच्या कामगारविरोधी धोरणामुळे तसेच मुंबईचे शांघाय करण्याच्या खटाटोपात गिरणी कामगारांना १९८२च्या संपानंतर अक्षरश: देशोधडीला लावण्यात आले. याच आघाडी शासनाने २३ मार्च २००१ला मुंबई विकास नियंत्रण नियमावली ५८ (७) (ड) नुसार प्रत्येक गिरणी कामगाराला घर आणि गिरणी मालकांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांमध्ये वारसांना प्राधान्याने नोकरी देण्याचे वचन देण्यात आले आहे. गिरणीच्या एकूण ६०० एकर जमिनींपैकी या नियमानुसार गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०० एकर जमीन उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र, आघाडी शासनाच्या धार्जिण्या धोरणामुळे जेमतेम ६० एकर जमीनच उपलब्ध झाली आहे.म्हाडाकडे अर्ज सादर केलेल्या दीड लाख कामगारांपैकी सात हजारांना सोडतीद्वारे घरे मिळाली. मात्र, त्यांची ऐपत नसल्याने त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामगारांनी स्वत:ची घरे दलालांमार्फत परस्पर विकली. या घराची किंमत साडेसात लाख अधिक इतर खर्च मिळून सुमारे साडेआठ ते नऊ लाख रूपये उभे करणे शक्य नसल्याने ही परिस्थिती कामगारांवर ओढवली. त्यामुळे यापुढील घरे विनामूल्यच देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.प्रभू यांना निवेदन सादर करताना कल्याणकारी संघाने गिरणी कामगारांना विनामूल्य घरे कशी उपलब्ध होऊ शकतील, याबाबतची योजना हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केलेल्या प्रस्तावाची प्रत प्रभूंना देण्यात आली आहे. या कार्यक्रमात चव्हाण यांनी, केंद्रीय व वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गिरण्यांची १८० एकर जमीन पंतप्रधानांशी चर्चा करून उपलब्ध करून दिल्यास त्यावर ६० ते ७० हजार घरे बांधणे शक्य असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)