शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांना न्याय द्या : गणपत चव्हाण

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

गिरण्यांची १८० एकर जमीन पंतप्रधानांशी चर्चा करून उपलब्ध करून दिल्यास त्यावर ६० ते ७० हजार घरे बांधणे शक्य असल्याचे सांगितले.

कणकवली : आघाडी शासनाच्या मालकधार्जिण्या धोरणामुळे गिरणी कामगारांची ससेहोलपट झाली आहे. हक्काचे मोफत घर मिळविण्यासाठी हा कामगार गेली दहा-बारा वर्षे रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहे. या गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, या मागणीचे निवेदन गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष गणपत चव्हाण यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक संस्था फेडरेशन आणि गोपुरी आश्रमाच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मेळाव्यात हे निवेदन मंत्री प्रभू यांना देण्यात आले. या निवेदनासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी स्वतंत्रपणे निवेदन देऊन याप्रश्नी पंतप्रधानांशी चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये संयुक्त महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीमध्ये गिरणी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, यापूर्वीच्या आघाडी शासनाच्या कामगारविरोधी धोरणामुळे तसेच मुंबईचे शांघाय करण्याच्या खटाटोपात गिरणी कामगारांना १९८२च्या संपानंतर अक्षरश: देशोधडीला लावण्यात आले. याच आघाडी शासनाने २३ मार्च २००१ला मुंबई विकास नियंत्रण नियमावली ५८ (७) (ड) नुसार प्रत्येक गिरणी कामगाराला घर आणि गिरणी मालकांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांमध्ये वारसांना प्राधान्याने नोकरी देण्याचे वचन देण्यात आले आहे. गिरणीच्या एकूण ६०० एकर जमिनींपैकी या नियमानुसार गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०० एकर जमीन उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र, आघाडी शासनाच्या धार्जिण्या धोरणामुळे जेमतेम ६० एकर जमीनच उपलब्ध झाली आहे.म्हाडाकडे अर्ज सादर केलेल्या दीड लाख कामगारांपैकी सात हजारांना सोडतीद्वारे घरे मिळाली. मात्र, त्यांची ऐपत नसल्याने त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामगारांनी स्वत:ची घरे दलालांमार्फत परस्पर विकली. या घराची किंमत साडेसात लाख अधिक इतर खर्च मिळून सुमारे साडेआठ ते नऊ लाख रूपये उभे करणे शक्य नसल्याने ही परिस्थिती कामगारांवर ओढवली. त्यामुळे यापुढील घरे विनामूल्यच देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.प्रभू यांना निवेदन सादर करताना कल्याणकारी संघाने गिरणी कामगारांना विनामूल्य घरे कशी उपलब्ध होऊ शकतील, याबाबतची योजना हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केलेल्या प्रस्तावाची प्रत प्रभूंना देण्यात आली आहे. या कार्यक्रमात चव्हाण यांनी, केंद्रीय व वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गिरण्यांची १८० एकर जमीन पंतप्रधानांशी चर्चा करून उपलब्ध करून दिल्यास त्यावर ६० ते ७० हजार घरे बांधणे शक्य असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)