शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सुधारित इष्टांकाप्रमाणेच हवे धान्य

By admin | Updated: April 4, 2017 20:23 IST

तहसीलदारांना निवेदन : वैभववाडी तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचा इशारा

वैभववाडी : अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे एप्रिलचे धान्य प्राप्त होत नसल्यामुळे तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी धान्य उचल न करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत धान्य दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदारारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्याला ३३ हजार ३८५ एवढे उद्दिष्ट मंजूर झाल्याचे सांगून आधार संलग्न शिधापत्रिकाधारकांच्या याद्या धान्य दुकानदारांकडून प्राप्त करून घेतल्या. त्या मंजूर करून पुन्हा धान्य दुकानांवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार मार्चपासून सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, जिल्हा पुरवठा विभागाकडे सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्य प्राप्त नसल्याने जुन्या पद्धतीने धान्य वितरण करण्यास सांगितले. त्याचवेळी एप्रिलपासून सुधारित याद्यांनुसार धान्यपुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून सर्वांना धान्य मिळेल असे सांगितले.धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक स्वप्निल प्रभू, धान्य दुकानदार दिलीप कोलते, आण्णा शिंदे, किशोर जैतापकर, बाबू रावराणे, धनंजय नारकर, संतोष राणे, फैय्याज सारंग, बाबलाल लांजेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तोपर्यंत धान्याची उचल नाहीतहसील कार्यालयात नायब तहसीलदार जी. आर. गावित यांच्या उपस्थितीत सोमवारी धान्य दुकानदार संघटनेची मासिक बैठक झाली. त्यावेळी तालुक्याचे उद्दिष्ट कमी केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्वांना धान्य मिळणार असे सांगितले असताना नवीन उद्दिष्टाप्रमाणे धान्य वितरित न केल्यास धान्य दुकानदारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील एकही रास्त धान्य दुकानदार धान्याची उचल करणार नाही, असा इशारा धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.