शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित इष्टांकाप्रमाणेच हवे धान्य

By admin | Updated: April 4, 2017 20:23 IST

तहसीलदारांना निवेदन : वैभववाडी तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचा इशारा

वैभववाडी : अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे एप्रिलचे धान्य प्राप्त होत नसल्यामुळे तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी धान्य उचल न करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत धान्य दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदारारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्याला ३३ हजार ३८५ एवढे उद्दिष्ट मंजूर झाल्याचे सांगून आधार संलग्न शिधापत्रिकाधारकांच्या याद्या धान्य दुकानदारांकडून प्राप्त करून घेतल्या. त्या मंजूर करून पुन्हा धान्य दुकानांवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार मार्चपासून सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, जिल्हा पुरवठा विभागाकडे सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्य प्राप्त नसल्याने जुन्या पद्धतीने धान्य वितरण करण्यास सांगितले. त्याचवेळी एप्रिलपासून सुधारित याद्यांनुसार धान्यपुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून सर्वांना धान्य मिळेल असे सांगितले.धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक स्वप्निल प्रभू, धान्य दुकानदार दिलीप कोलते, आण्णा शिंदे, किशोर जैतापकर, बाबू रावराणे, धनंजय नारकर, संतोष राणे, फैय्याज सारंग, बाबलाल लांजेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तोपर्यंत धान्याची उचल नाहीतहसील कार्यालयात नायब तहसीलदार जी. आर. गावित यांच्या उपस्थितीत सोमवारी धान्य दुकानदार संघटनेची मासिक बैठक झाली. त्यावेळी तालुक्याचे उद्दिष्ट कमी केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार धान्य दुकानदारांनी एप्रिलपासून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्वांना धान्य मिळणार असे सांगितले असताना नवीन उद्दिष्टाप्रमाणे धान्य वितरित न केल्यास धान्य दुकानदारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेच्या सुधारित इष्टांकाप्रमाणे धान्यपुरवठा होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील एकही रास्त धान्य दुकानदार धान्याची उचल करणार नाही, असा इशारा धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.