शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक धडकणार!

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : संपूर्ण राज्यात होणार एकाच दिवशी मोर्चा

वाटूळ : संचमान्यतेचे बदललेले निकष, वाढीव पदावरील मंजूर शिक्षकांना तत्काळ वेतन सुुरु करणे अशा महत्त्वाच्या मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने राज्यभरातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक २२ जुलै रोजी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.२० जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ जुलैपासून आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना महासंघातर्फे देण्यात आला आहे. संचमान्यतेच्या नव्या निकषामुळे ३ हजार अनुदानित तुकड्या कमी होऊन राज्यभरातील १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. २००३ ते २०११ पर्यंतच्या एक हजार वाढीव पदांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने २ मार्च २०१४ रोजी घेतला. परंतु त्या शिक्षकांच्या वेतनाची कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षक आता आक्रमक झाले आहेत.गेल्या कित्येक वर्षापासून या प्रश्नांवर संघटना आंदोलने करीत असून, प्रत्येक वेळी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले असल्याने यावेळी चार टप्प्यांमध्ये संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश औताडे यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यामध्ये २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तद्नंतर २४ जुलै रोजी राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यानंतर २८ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे जेल भरो आंदोलन तसेच शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक पु्ण्यतिथी दिनी १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. (वार्ताहर)५आॅनलाईन संचमान्यतेसंबंधित निकषांमुळे ज्युनिअर कॉलेजमध्ये सुमारे १० हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. तसेच संचमान्यतेच्या सॉफ्टवेअरच्या त्रुटींमुळे जेवढ्या तुकड्या कमी तेवढे शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. परिणामी संचमान्यता न झाल्यास नियमीत शिक्षकांचे पगारदेखील रखडणार आहेत. तसेच आणखी महत्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आंदोलनात सक्रिय सहभागी घ्या.- प्रा. प्रकाश औताडे,अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय संघटना, रत्नागिरी.