शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

..तर नगरपंचायत जिंकली असती

By admin | Updated: May 30, 2016 00:47 IST

शंकर कांबळी : कुवत नसलेल्यांना दिली उमेदवारी

कुडाळ नगरपंचायत जिंकली असती. ज्या उमेदवारांची कुवत नाही, अशा उमेदवारांचे नेतृत्व पक्षाने पाहिले नाही. त्यामुळेच कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला, असे यावेळी माजी आमदार शंकर कांबळी यांनी स्पष्ट केले. ते सालईवाडा येथील कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये अधिपत्य स्थापन करायचे असेल, तर एकमुखाने, एकदिलाने काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असली पाहिजे. तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ यांचे नेतृत्वगुण पाहता त्यांना आमदारकी लढविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी केले.शिवसेनेतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर येथील गणेश हॉल-सालईवाडा येथे रविवारी पार पडले. शिबिराच्या प्रारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी कांबळी बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख राजू नाईक, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, एस.टी. कामगार सेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, एकनाथ गोसावी, श्रृतिका दळवी, रश्मी माळवंदे, नगरसेविका शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, शहरप्रमुख शब्बीर मणियार, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, श्रेया परब, अशोक दळवी, सुवर्णा कोठावळे, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. माजी आमदार कांबळी म्हणाले, सर्वांनीच पक्षाची उपेक्षा केली तर पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे मी करेन तेच खरे, असे केल्यास पक्षाला याचा हादरा बसू शकतो. अत्यंत सावधगिरीने पक्षाची बांधणी करून चांगले नेतृत्व करा, असा सल्ला कांबळी यांनी दिला. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, ज्यावेळी शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिकट परिस्थिती होती, त्यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुखाची जबाबदारी आपण हाती घेतली. त्यावेळी तालुक्यात काही ठिकाणी शाखाप्रमुख, विभागप्रमुख कार्यरत नव्हते. अशा ठिकाणी शैलेश परब व अन्य कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारिणीची निवड केली व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. राजू नाईक म्हणाले, कुठलाही कार्यक्रम अथवा सभा घेताना आपल्या कार्यकर्त्यांना डावलू नका. मतभेद न करता सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा संदेश दिला. तर उपशहर संघटक श्रृतिका दळवी, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, समीर मामलेकर यांचेही यावेळी विशेष अभिनंदन केले. (वार्ताहर)कांबळींना विश्वास : नारायण राणे आमदार होणार नारायण राणे हे आता आमदार होणार हे निश्चित आहे. ते आता अजून ताकदीने काम करणार आहेत. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमाने काम करा, असे आवाहन शंकर कांबळी यांनी केले.