शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

सामंत पक्षाबाहेर पडले हे चांगलेच झाले

By admin | Updated: December 8, 2015 00:34 IST

शेखर निकम : व्यक्तीनिष्ठ राजकारणाने रत्नागिरीत पक्षाचे नुकसान, आता कुरबुरी थांबल्या

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांत रत्नागिरीत पक्ष संघटनेला महत्व देण्यापेक्षा ते एका व्यक्तीला दिले गेले हे खरे आहे. अशी व्यक्ती अचानकपणे दुसऱ्या पक्षात गेल्यानेच पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम झाला. पक्षाचे नुकसान करणारे, विश्वासघात करणारे उदय सामंत पक्षात राहून कुरबुरीच करीत राहिले असते. ते पक्षातून गेले हे चांगलेच झाले, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी येथे आज पत्रकारपरिषदेत बोलताना लगावला. कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात पक्षाने चांगली मुसंडी मारली आहे. पक्ष बळकट करण्यात यश येत आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी सुरू आहे. जे फुटिरांबरोबर गेले, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत पुन्हा येत आहेत, असे ते म्हणाले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व संजय कदम हे दोन आमदार आहेत. त्यांचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता रत्नागिरीसह अन्य मतदारसंघातही संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. भास्कर जाधव व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात अजून मनोमिलन झाले नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, काहीवेळा किरकोळ मनभेद असतात, ते मिटले. त्यांच्यात मतभेद नाहीत. रत्नागिरी पालिकेच्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला दोन प्रचारसभांमध्ये ते एकाच व्यासपीठावर होते, असेही निकम म्हणाले. (प्रतिनिधी)तटकरे-जाधव २० नंतर रत्नागिरीतप्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना येत्या २० डिसेंबरनंतर संघटनात्मक बांधणीसाठी रत्नागिरीत एकाच व्यासपीठावर आणणार असल्याचे सूतोवाच निकम यांनी केले. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच चपराक बसेल, असे निकम म्हणाले. कदम जाणार उच्च न्यायालयातयेथील न्यायालयाने आमदार संजय कदम यांना शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याविरोधातील आव्हान याचिका आमदार कदम हे लवकरच उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. पक्ष त्यांच्या पूर्णत: पाठीशी असल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले.