शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

बेरोजगारीचा प्रश्न प्रचारातही दुर्लक्षित

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

विधानसभा निवडणूक : लोकप्रतिनिधींची धाव ‘पाखाडी’च्या पुढे नाहीच!

रहिम दलाल - रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी खालच्या थरापर्यंत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र, जिल्ह्यातील बेरोजगारीच्या प्रश्नाला सर्वच उमेदवार बगल देत आहेत. त्यामुळे रस्ते, पाखाड्यातून जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे भासविणाऱ्या लोकप्रतिनिधीनी किंवा उमेदवारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरही चर्चा करणे आवश्यक आहे.रत्नागिरीच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या उमेदवाराने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला नसल्याचे दिसून येते. मात्र, ज्या - ज्यावेळी शासकीय कार्यालयांमध्ये नोकर भरती करण्यात येते त्या-त्या वेळी शिवसेनेने आंदोलने करुन स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न उठवून धरला होता. त्यानंतर मनसेनेही स्थानिक भरती करण्याबाबत आवाज उठविला होता. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत आहे. परजिल्ह्यातील लोक नोकऱ्या काबीज करत आहेत. येथे रोजगार, नोकऱ्या मिळत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांना मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांचा आधार घ्यावा लागत आहे. या सुशिक्षितांचा राजकारणी आपल्या फायद्यासाठी चांगला वापर करुन घेत आहेत. मात्र, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात आजपर्यंत सर्वच राजकारण्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आली की, केवळ आश्वासनांची खैरात करून पाच वर्षे त्यावर ‘ब्र’सुध्दा काढण्यात येत नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांवर चिखलफेक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, येथील तरुण सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटापाण्याच्या प्रश्न असलेला रोजगारीचा प्रश्न एकाही पक्षाच्या उमेदवाराने उचलून धरलेला दिसत नाही. निवडणुकीमध्ये तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर खुलेआम चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, त्यावर चर्चा न करता या निवडणुकीच्या धामधुमीत केवळ तरुणांचा वापर करुन घेतला जात आहे. मात्र, बेरोजगारीवर कोणीही चर्चा करीत नाही. त्यामुळे बेरोजगारी दूर कशी होणार? असा सवाल केला जात आहे.मनसे, शिवसेनेने केला होता स्थानिकांसाठी लढा.परजिल्ह्यातील लोक करतायत स्थानिकांच्या नोकऱ्या काबीज.रत्नागिरीतील सुशिक्षित बेरोजगारांना पुणे, मुंबईसारख्या शहरांचा घ्यावा लागतोय आसरा.