शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Updated: August 18, 2015 23:12 IST

सर्वांचे लक्ष : रायपाटण, पाचलबाबत चर्चांना ऊत

राजापूर : राज्य शासनाने २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीबाबत सकारात्मकता दाखवल्याने राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्यानुसार मागील अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या पूर्व परिसरातील रायपाटण व पाचल या दोन गावांच्या नावाची नवीन तालुक्यासाठी चर्चा सुरु झाली आहे.गेली अनेक वर्षे राजापूर तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करावा, अशी मागणी सातत्याने रेटून धरली जात आहे. त्यानुसार तालुक्याचे नियोजित ठिकाण हे आपल्या गावी असावे, अशी मागणीही मागील काही वर्षे रायपाटणसह पाचलवासीयांनी कायम ठेवली आहे.राजापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकारमानाने विशाल असून, पूर्वेकडे सह्याद्री, तर पश्चिमेला अरबी समुद्र असा विस्तारलेला आहे. राजापूर शहर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असले तरी त्या ठिकाणापासून अनेक गावे खुप दूरवर आहेत. त्यामध्ये पुर्व परिसरातील गावे तर अती दुर्गम अशा ठिकाणी आहेत. परिणामी शासकीय कामकाजासाठी जनतेला राजापूरला येताना खूप दगदग सहन करावी लागते. त्यामुळे राजापूर तालुक्याचे विभाजन करुन नवीन तालुक्याची निर्मिती करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे.रायपाटण व पाचलने ही मागणी रेटून धरली असली तरी रायपाटण गावची एक ‘फाईल’ यापूर्वीच मंत्रालयात सादर झाली आहे. याआधीच्या अनेक विधिमंडळ अधिवेशनात रायपाटण तालुका निर्मितीबाबतचे प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले होते. मात्र, वेळोवेळी आर्थिक चणचण हेच कारण पुढे करत वेळ मारुन नेण्यात आली होती. आता खुद्द शासनानेच २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न हाती घेत सकारात्मकता दाखवली आणि तालुका विभाजनासह पूर्व परिसरातील नवीन तालुका निर्मितीचा धूळ खात पडून राहिलेला प्रश्न अचानक उसळी मारत वर येण्याच्या मार्गावर आहे.सध्या दोन गावात तालुक्यांसाठी प्रचंड चुरस आहे. त्यामध्ये मोठी बाजारपेठ व विभागाची महत्वपूर्ण शासकीय कार्यालये असल्याची पाचलची हीच जमेची बाजू असतानाच दुसरीकडे तालुका निर्मितीनंतर शासकीय कार्यालयीन इमारतींसाठी लागणारी आवश्यक जागा रायपाटण गावात आहे. ही बाब रायपाटणच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे आता शासन प्रथम राजापूर तालुक्याचे विभाजन करत नवीन तालुक निर्मितीसाठी आग्रही आहे का, हा खरा सवाल आहे.शासन त्यासंदर्भात सकारात्मक राहिले तर रायपाटण की पाचल, यापैकी कुणाची निवड करते की, अन्य पर्याय निवडते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)जैतापूरलाही आशादेशातील सर्वांत मोठा सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापुरात होऊ घातला आहे. पश्चिम भागातील सुमारे ४० ते ५० गावांसाठी यापूर्वी सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात जैतापूर परिसराचा होणारा विकास लक्षात घेता शासन त्या परिसराची नवीन तालुक्यासाठी निवड करु शकते.