शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेतील पोषण आहाराचा वाद वाढू लागला

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

राजकीय सावटामुळे गुंता वाढला : संस्था चालकांनी योग्य तोडगा काढण्याची गरज

 तळवडे : पोषण आहार योजनेत प्रशालेचे मुख्याध्यापक, प्रशासकीय कर्मचारी शिक्षकवर्ग बळी पडत आहेत. असाच प्रकार तळवडे श्री जनता विद्यालयात घडला आहे. या विद्यालयातील पोषण आहाराचा वाद काहीही केल्या मिटत नसल्याचे दिसत असून, उलट वाढण्याचीच चर्चा आहे. पण या वादावर प्रशालेच्या संस्थाचालकांनी योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे. तळवडे विद्यालयात पोषण आहार वाद गेले आठ महिने गाजत आहे. या पोषण आहारावरून या प्रशालेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांना पोषण आहारात दोषी आढळल्याचे कारण देत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार निलंबित केले होते. त्यानंतर या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मनीषा पाटील यांची नियुक्ती शिक्षण विभागाच्या आदेशानुसार व संस्था, पदाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पण या दोन्ही मुख्याध्यापकांना पालकांच्या आक्षेपाला सामोरे जावे लागले. पोषण आहार हा असा घटक आहे की, मुलांच्या खाण्यावरून त्याचे प्रमाण कमी-जास्त होत असते. याची योग्य नोंद ठेवणे प्रत्येक प्रशालेच्या मुख्याध्यापकासाठी कठीण गोष्ट आहे. कारण यात तांत्रिक त्रुटी आहेत. यापूर्वी या प्रशालेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर याच्यावर पोषण आहाराचा वाढीव साठा आढळल्याने कारवाई करण्यात आली होती. पण आता विरोधी प्रकाश परब गटाने सुध्दा शिक्षण विभाग व प्रशासनाला या शाळेच्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक यांच्या कार्यकाळातही पोषण आहार साठा जास्त आढळला. पोषण आहार शिल्लक आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपासून हा पोषण आहार वाद वाढत असल्याने या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात नाही. या प्रशालेतील पालकांचे वारंवार पोषण आहारावरून वाद होतात. त्यामुळे पोषण आहार संबंधित कर्मचाऱ्यांनी शिजवू नये, असे पत्र प्रभारी मुख्याध्यापक मनीषा पाटील यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे या प्रशाळेच्या पोषण आहारावरून दोन गट गावात पडले आहेत. हा वाद कायदेशीर लढाईच्या तयारीत आहे. तळवडे जनता विद्यालयाच्या शालेय पोषण आहारावरून निलंबित करण्यात आलेले मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांना संस्थेच्या सचिवांनी हजर करून घेतले. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी पोलिस ठाणे गाठले. मुख्याध्यापक मालवणकर यांना पोषण आहारात दोषी ठरवून शिक्षण विभाग व संस्थेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. विलंबन होऊन १२० दिवस उलटले होते. त्यामुळे संस्थेचे सचिव अरूण मालवणकर यांनी श्यामसुंदर मालवणकर यांना मुख्याध्यापक पदावर रूजू करून घेतले. त्यामुळे यासंदर्भात संस्थाध्यक्ष विष्णू पेडणेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तळवडे येथील जनता विद्यालय व मळेवाड विद्यालय. श्री जनता विद्यालयाचा हा वाद न्यायालयात गेला आहे. (प्रतिनिधी) हेव्यादाव्यांची मुख्याध्यापकांना झळ जिल्ह्यातील प्रत्येक प्रशालेत पोषण आहार शिल्लक राहतोच. यात कुठलाही मुख्याध्यापक तोडगा काढू शकत नाही. हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. पण प्रशासनाने पोषण आहार योजना प्रशालेच्या मुख्याध्यापकांवर सोपविल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. एखाद्या संस्थेत राजकीय वाद, हेवेदावे असल्यावर मुख्याध्यापक भरडले जातात. अशा राजकीय वादाचा फटका तळवडेतील मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर व प्रभारी मुख्याध्यापक मनीषा पाटील यांना बसत आहे.