शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव अंगणवाडीला ‘आयएसओ’

By admin | Updated: November 5, 2016 00:50 IST

शिरपेचात मानाचा तुरा : मानांकन मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनण्याचा मान मिळाल्यानंतर ओसरगाव कानसळी अंगणवाडीला ‘आयएसओ ९००१ : २०१५’ मानांकनही मिळाले आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळविणारी कानसळी ही जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी ठरली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, लवकरच मान्यवरांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिजिटलच्या जमान्यात आता अंगणवाड्याही मागे राहिलेल्या नाहीत. सिंधुदुर्गातील २०० हून अधिक अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसळी अंगणवाडीने एक पाऊल पुढे टाकत लोकसहभागातून प्रथमत: स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होण्याचा जिल्ह्यात पहिला मान मिळविला आहे. त्यानंतर ‘आयएसओ’ मानांकनही मिळविण्याचा पहिला मान मिळविला आहे. ओसरगाव-कानसळी अंगणवाडीचे पूर्वीचे रूप पूर्णपणे पालटून गेले असून, स्मार्ट डिजिटल अंगणवाडीमुळे अंगणवाडीमध्ये मुलांच्या येण्याचा ओढाही वाढला आहे. मराठी, इंग्रजीत मजकूर लिहिलेल्या बोलक्या भिंती, शब्द, अंक ओळख, थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो, बसण्यासाठी खुर्ची, टेबल, शुद्ध पाणी, गणवेश, ओळखपत्र, जमिनीवर कारपेट, कार्टून्स, बगीचा, खेळणी या गोष्टी अंगणवाडीमध्ये पहावयास मिळतात. अशाप्रकारे बालवयातच शाळेची ओढ नव्हे, तर वेड लागले पाहिजे, अशा पद्धतीने अंगणवाडी बनविण्यात आली आहे. त्यामुळेच या अंगणवाडीची तपासणी अधिकारी प्रवीण लोंढे यांनी करत या अंगणवाडीची ‘आयएसओ’ साठी निवड केली होती. ही अंगणवाडी स्मार्ट, डिजिटल बनविण्यासाठी आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी ओसरगाव-कानसळी अंगणवाडी सेविका नंदा आळवे, मदतनीस सुप्रिया सावंत, मुख्य सेविका श्रद्धा दीपक माने यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच येथीलच श्री विठ्ठल रखुमाई विकास मंडळानेही आर्थिक मदत केल्याने लोकसहभागातून स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होऊ शकली. तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. लवकरच स्मार्ट डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. (प्रतिनिधी)लोकसहभागातून रूपडे पालटलेअंगणवाडी (बालवाडी) म्हटले की, पूर्वी मंदिर, समाजमंदिर किंवा भाड्याच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये भरणारी शाळा असेच चित्र दिसत होते. मात्र, मागील काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या व स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे रूपडे बदलू लागले आहे. अंगणवाड्यांचा कायापालट झाला आहे. लहान मुलांना गंमत गाण्यामधून शिकविता आले पाहिजे, यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न होताना दिसून येत आहेत.