शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब

देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील अतिक्रमणांना धोबीघाट दाखवणाऱ्या बांधकाम विभागाने स्वत: बांधलेली संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब लावला आहे. ही भिंत अपघाताला कारणीभूत ठरत असून, बांधकाम विभागाने ती तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वर संगमेश्वरजवळ असलेले शासकीय विश्रामगृह १०० वर्षांचे झाले आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमासमोरच विश्रामगृह आहे. येथे फार पूर्वी काळ्या दगडांचा वापर करून संरक्षक भिंंत उभारण्यात आली आहे. पूर्वी या महामार्गावरची वाहतूक मर्यादित होती. त्यावेळी या भिंतीचा अडसर जाणवला नाही. आता मात्र महामार्गावरची वाहतूक वाढल्याने या भिंतीचा मोठा त्रास दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भिंतीलाच लागून धोकादायक आणि अरुंद वळण आहे. भिंत महामार्गाला टेकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी बाजूपट्टीही शिल्लक राहिलेली नाही. संगमेश्वरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. रत्नागिरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना समोरुन एखादे वाहन आल्यास आपल्या वाहनावर ताबा मिळवणे कठीण जाते. यामुळे आजवर अनेक अवजड वाहने थेट नदीत कोसळली आहेत. आजवर येथे झालेल्या अनेक अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले असून, १५पेक्षा अधिक प्रवासी जायबंदी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने शासकीय विश्रामगृहाजवळील या धोकादायक भिंंतीजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आपटूनही येथे अनेक अपघात घडले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे पादचारी आणि वाहनचालकांनी ही भिंंत तातडीने हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भिंंत हटवायची नसेल तर नदीच्या बाजूने काँक्रीटची संरक्षक भिंंत उभारून वळण रुंद करणे शक्य असतानाही बांधकाम विभाग दोन्ही गोष्टींचा विचारच करत नसल्याने याठिकाणी घडणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिला आहे. (प्रतिनिधी)