शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब

देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील अतिक्रमणांना धोबीघाट दाखवणाऱ्या बांधकाम विभागाने स्वत: बांधलेली संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब लावला आहे. ही भिंत अपघाताला कारणीभूत ठरत असून, बांधकाम विभागाने ती तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वर संगमेश्वरजवळ असलेले शासकीय विश्रामगृह १०० वर्षांचे झाले आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमासमोरच विश्रामगृह आहे. येथे फार पूर्वी काळ्या दगडांचा वापर करून संरक्षक भिंंत उभारण्यात आली आहे. पूर्वी या महामार्गावरची वाहतूक मर्यादित होती. त्यावेळी या भिंतीचा अडसर जाणवला नाही. आता मात्र महामार्गावरची वाहतूक वाढल्याने या भिंतीचा मोठा त्रास दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भिंतीलाच लागून धोकादायक आणि अरुंद वळण आहे. भिंत महामार्गाला टेकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी बाजूपट्टीही शिल्लक राहिलेली नाही. संगमेश्वरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. रत्नागिरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना समोरुन एखादे वाहन आल्यास आपल्या वाहनावर ताबा मिळवणे कठीण जाते. यामुळे आजवर अनेक अवजड वाहने थेट नदीत कोसळली आहेत. आजवर येथे झालेल्या अनेक अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले असून, १५पेक्षा अधिक प्रवासी जायबंदी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने शासकीय विश्रामगृहाजवळील या धोकादायक भिंंतीजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आपटूनही येथे अनेक अपघात घडले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे पादचारी आणि वाहनचालकांनी ही भिंंत तातडीने हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भिंंत हटवायची नसेल तर नदीच्या बाजूने काँक्रीटची संरक्षक भिंंत उभारून वळण रुंद करणे शक्य असतानाही बांधकाम विभाग दोन्ही गोष्टींचा विचारच करत नसल्याने याठिकाणी घडणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिला आहे. (प्रतिनिधी)