शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

कडावल परिसरात भातकापणीत पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: October 13, 2015 23:26 IST

वैरणीच्या टंचाईची भीती : हातातोंडाशी आलेल्या पिकांना सतावतोय धोका

कडावल :कडावल परिसरात भातकापणीस सरुवात झाली असली, तरी रिमझीम पडणाऱ्या पावसामुळे या कामात खोळंबा होत आहे. पावसामुळे कापलेले पीक वाळवता येत नसल्याने भाताच्या दाण्यांना कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरल्याच्या पेंढाही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यंदाच्या खरीप भातशेती हंगामात निसर्गाच्या प्रतिकूलतेचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. यंदा हंगामाच्या सरुवातीला भातपेरणीच्या कालावधीत योग्य प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची कामगत विनासायास पार पडली. मात्र, नंतर भात लावणीच्या काळात कित्येक दिवस पाऊस गायब झाल्यामुळे भात लावणीची कामगत बऱ्याच विलंबाने पूर्ण झाली. भातपिकाला ज्या अवस्थेमध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते. त्या पोटरी अवस्थेतही पाण्याअभावी पिकांचे हाल झाले. भात पिकाला पाण्याची गरज होती, तेव्हा पाऊस गायब झाला आणि आता भात कापणीच्या वेळी पाऊस व पाऊससदृश वातावरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.यावर्षी परिसरात हळव्या जातीचे काही भाताचे वाण गणेशोत्सव काळातच कापणी योग्य झाले होते. तेव्हा वातावरण कामास अनुकूल होते. पाऊस पडत नव्हता. आकाशही निरभ्र होते. मात्र, गणेशोत्सवाच्या धामधुमीत नाही. आता काही शेतकऱ्यांना भातकापणीस सुरुवात केली असली, तरी पाऊस व पाऊस सदृश वातावरणामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु भात कापणीच्या मुहूर्ताबरोबरच पावसाचेही पुन्हा आगमन झाल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. अधुनमधून पडणारा पाऊस व अवकाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.कापून झालेले भातपीक उन्हात वाळविणे गरजेचे असत; परंतु पावसाच्या भीतीने पीक वाळविण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. कापलेले पीक न वाळवता कवळ्या ठेवून तशीच झोडणी केली जात आहे.त्यामुळे ओलसरपणामुळे भाताला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरसाच्या पेंढ्याही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई होण्याचीही भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)