शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

कडावल परिसरात भातकापणीत पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: October 13, 2015 23:26 IST

वैरणीच्या टंचाईची भीती : हातातोंडाशी आलेल्या पिकांना सतावतोय धोका

कडावल :कडावल परिसरात भातकापणीस सरुवात झाली असली, तरी रिमझीम पडणाऱ्या पावसामुळे या कामात खोळंबा होत आहे. पावसामुळे कापलेले पीक वाळवता येत नसल्याने भाताच्या दाण्यांना कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरल्याच्या पेंढाही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यंदाच्या खरीप भातशेती हंगामात निसर्गाच्या प्रतिकूलतेचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. यंदा हंगामाच्या सरुवातीला भातपेरणीच्या कालावधीत योग्य प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची कामगत विनासायास पार पडली. मात्र, नंतर भात लावणीच्या काळात कित्येक दिवस पाऊस गायब झाल्यामुळे भात लावणीची कामगत बऱ्याच विलंबाने पूर्ण झाली. भातपिकाला ज्या अवस्थेमध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते. त्या पोटरी अवस्थेतही पाण्याअभावी पिकांचे हाल झाले. भात पिकाला पाण्याची गरज होती, तेव्हा पाऊस गायब झाला आणि आता भात कापणीच्या वेळी पाऊस व पाऊससदृश वातावरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.यावर्षी परिसरात हळव्या जातीचे काही भाताचे वाण गणेशोत्सव काळातच कापणी योग्य झाले होते. तेव्हा वातावरण कामास अनुकूल होते. पाऊस पडत नव्हता. आकाशही निरभ्र होते. मात्र, गणेशोत्सवाच्या धामधुमीत नाही. आता काही शेतकऱ्यांना भातकापणीस सुरुवात केली असली, तरी पाऊस व पाऊस सदृश वातावरणामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु भात कापणीच्या मुहूर्ताबरोबरच पावसाचेही पुन्हा आगमन झाल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. अधुनमधून पडणारा पाऊस व अवकाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.कापून झालेले भातपीक उन्हात वाळविणे गरजेचे असत; परंतु पावसाच्या भीतीने पीक वाळविण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. कापलेले पीक न वाळवता कवळ्या ठेवून तशीच झोडणी केली जात आहे.त्यामुळे ओलसरपणामुळे भाताला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरसाच्या पेंढ्याही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई होण्याचीही भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)