शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कडावल परिसरात भातकापणीत पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: October 13, 2015 23:26 IST

वैरणीच्या टंचाईची भीती : हातातोंडाशी आलेल्या पिकांना सतावतोय धोका

कडावल :कडावल परिसरात भातकापणीस सरुवात झाली असली, तरी रिमझीम पडणाऱ्या पावसामुळे या कामात खोळंबा होत आहे. पावसामुळे कापलेले पीक वाळवता येत नसल्याने भाताच्या दाण्यांना कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरल्याच्या पेंढाही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यंदाच्या खरीप भातशेती हंगामात निसर्गाच्या प्रतिकूलतेचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. यंदा हंगामाच्या सरुवातीला भातपेरणीच्या कालावधीत योग्य प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची कामगत विनासायास पार पडली. मात्र, नंतर भात लावणीच्या काळात कित्येक दिवस पाऊस गायब झाल्यामुळे भात लावणीची कामगत बऱ्याच विलंबाने पूर्ण झाली. भातपिकाला ज्या अवस्थेमध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते. त्या पोटरी अवस्थेतही पाण्याअभावी पिकांचे हाल झाले. भात पिकाला पाण्याची गरज होती, तेव्हा पाऊस गायब झाला आणि आता भात कापणीच्या वेळी पाऊस व पाऊससदृश वातावरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.यावर्षी परिसरात हळव्या जातीचे काही भाताचे वाण गणेशोत्सव काळातच कापणी योग्य झाले होते. तेव्हा वातावरण कामास अनुकूल होते. पाऊस पडत नव्हता. आकाशही निरभ्र होते. मात्र, गणेशोत्सवाच्या धामधुमीत नाही. आता काही शेतकऱ्यांना भातकापणीस सुरुवात केली असली, तरी पाऊस व पाऊस सदृश वातावरणामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु भात कापणीच्या मुहूर्ताबरोबरच पावसाचेही पुन्हा आगमन झाल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. अधुनमधून पडणारा पाऊस व अवकाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.कापून झालेले भातपीक उन्हात वाळविणे गरजेचे असत; परंतु पावसाच्या भीतीने पीक वाळविण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. कापलेले पीक न वाळवता कवळ्या ठेवून तशीच झोडणी केली जात आहे.त्यामुळे ओलसरपणामुळे भाताला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरसाच्या पेंढ्याही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई होण्याचीही भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)