शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कडावल परिसरात भातकापणीत पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: October 13, 2015 23:26 IST

वैरणीच्या टंचाईची भीती : हातातोंडाशी आलेल्या पिकांना सतावतोय धोका

कडावल :कडावल परिसरात भातकापणीस सरुवात झाली असली, तरी रिमझीम पडणाऱ्या पावसामुळे या कामात खोळंबा होत आहे. पावसामुळे कापलेले पीक वाळवता येत नसल्याने भाताच्या दाण्यांना कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरल्याच्या पेंढाही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यंदाच्या खरीप भातशेती हंगामात निसर्गाच्या प्रतिकूलतेचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. यंदा हंगामाच्या सरुवातीला भातपेरणीच्या कालावधीत योग्य प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची कामगत विनासायास पार पडली. मात्र, नंतर भात लावणीच्या काळात कित्येक दिवस पाऊस गायब झाल्यामुळे भात लावणीची कामगत बऱ्याच विलंबाने पूर्ण झाली. भातपिकाला ज्या अवस्थेमध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते. त्या पोटरी अवस्थेतही पाण्याअभावी पिकांचे हाल झाले. भात पिकाला पाण्याची गरज होती, तेव्हा पाऊस गायब झाला आणि आता भात कापणीच्या वेळी पाऊस व पाऊससदृश वातावरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.यावर्षी परिसरात हळव्या जातीचे काही भाताचे वाण गणेशोत्सव काळातच कापणी योग्य झाले होते. तेव्हा वातावरण कामास अनुकूल होते. पाऊस पडत नव्हता. आकाशही निरभ्र होते. मात्र, गणेशोत्सवाच्या धामधुमीत नाही. आता काही शेतकऱ्यांना भातकापणीस सुरुवात केली असली, तरी पाऊस व पाऊस सदृश वातावरणामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु भात कापणीच्या मुहूर्ताबरोबरच पावसाचेही पुन्हा आगमन झाल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. अधुनमधून पडणारा पाऊस व अवकाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.कापून झालेले भातपीक उन्हात वाळविणे गरजेचे असत; परंतु पावसाच्या भीतीने पीक वाळविण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. कापलेले पीक न वाळवता कवळ्या ठेवून तशीच झोडणी केली जात आहे.त्यामुळे ओलसरपणामुळे भाताला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरसाच्या पेंढ्याही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई होण्याचीही भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)