शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

समुद्रात वादळाची तीव्रता वाढली

By admin | Updated: October 9, 2015 23:30 IST

नौका स्थिरावल्या बंदरात : मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना

मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याने वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मच्छिमारांना मासेमारीला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. बंदर विभागाने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावला असून, मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून समुद्रात वादळसदृश स्थितीमुळे मालवण बंदरात आधारासाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्स शुक्रवारीही बंदरात स्थिरावले होते. तर मालवणमधील ट्रॉलर्ससह मोठ्या नौकांनी सुरक्षित असे देवगड बंदर गाठले आहे. गोवा राज्याकडून नैऋत्य दिशेला ४१० किलोमीटर व मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर उद्भवलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने व प्रसंगी ते ५० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.बंदर विभागाने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा देत मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांना माघारी बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. समुद्री वादळामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मासळीचे दर दोन दिवसांत गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत. वादळी वाऱ्यांचा जोर येत्या २४ तासांत कायम राहणार असून, पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुख्यालय सोडू नये : भंडारीअरबी समुद्राच्या पूर्व मध्य दिशेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ व अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय प्रमुखांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मासेमारीला मनाईरत्नागिरी : पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मच्छिमार नौकांना समुद्रात जाण्याची मनाई करण्यात आली आहे.मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनाऱ्यावर परतावे, असा इशारा अप्पर उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारीच या बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत.