शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समुद्रात वादळाची तीव्रता वाढली

By admin | Updated: October 9, 2015 23:30 IST

नौका स्थिरावल्या बंदरात : मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना

मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याने वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मच्छिमारांना मासेमारीला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. बंदर विभागाने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावला असून, मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून समुद्रात वादळसदृश स्थितीमुळे मालवण बंदरात आधारासाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्स शुक्रवारीही बंदरात स्थिरावले होते. तर मालवणमधील ट्रॉलर्ससह मोठ्या नौकांनी सुरक्षित असे देवगड बंदर गाठले आहे. गोवा राज्याकडून नैऋत्य दिशेला ४१० किलोमीटर व मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर उद्भवलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने व प्रसंगी ते ५० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.बंदर विभागाने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा देत मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांना माघारी बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. समुद्री वादळामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मासळीचे दर दोन दिवसांत गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत. वादळी वाऱ्यांचा जोर येत्या २४ तासांत कायम राहणार असून, पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुख्यालय सोडू नये : भंडारीअरबी समुद्राच्या पूर्व मध्य दिशेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ व अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय प्रमुखांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मासेमारीला मनाईरत्नागिरी : पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मच्छिमार नौकांना समुद्रात जाण्याची मनाई करण्यात आली आहे.मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनाऱ्यावर परतावे, असा इशारा अप्पर उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारीच या बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत.