शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना

By admin | Updated: November 6, 2015 23:40 IST

रणजित देसाई : कृषी समिती सभेत खळबळजनक आरोप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी 30 लाखांचीच नुकसानभरपाई

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फळपीक विमा योजनेंतर्गत सुमारे ४ कोटींचे हप्ते विमा कंपनीला भरण्यात आले, तर नुकसानीपोटी केवळ विमा कंपनीकडून ४ कोटी ३० लाख मिळाले. विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे, असा खळबळजनक आरोप सभाध्यक्ष रणजित देसाई यांनी कृषी समिती सभेत केला. विमा कंपनीचे प्रतिनिधी जर सभेत येऊन योजनेची परिपूर्ण माहिती देत नसतील तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेऊ नये असे जाहीर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेची कृषी समितीची सभा कृषी सभापती तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, रेश्मा जोशी, सोनाली घाडीगांवकर, विभावरी खोत, दिलीप रावराणे, योगिता परब, प्रमोद सावंत आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फळपीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, या योजनेपोटी शेतकरी व शासन हिस्सा म्हणून संबंधित विमा कंपनीला सुमारे ४ कोटी एवढा (प्रीमियम) हप्ता जमा करण्यात आला. मात्र, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे तीन ते चार दिवस अवेळी पाऊस पडूनही केवळ एक दिवसाचे नुकसान दाखवून नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ३० लाख भरपाई देण्यात आली. विमा कंपनीकडून देण्यात आलेली नुकसानभरपाई अल्प स्वरूपात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विमा कंपनीची ८ ते १० पर्जन्य व तापमानमापक केंद्रे बंद स्थितीत आहेत. मग कोणत्या आधारावर ही नुकसानभरपाई विमा कंपनीने दिली. विमा कंपनीचे निकष जिल्ह्यात लागू होत नाहीत. ही पॉलिसीच सदोष आहे. विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबविली जात असल्याचा खळबळजनक आरोप सभापती रणजित देसाई यांनी सभेत केला, तर या विमा योजनेची माहिती, निकष याबाबत बोलवूनही विमा कंपनीचे प्रतिनिधी सभेत येत नाहीत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तरी जर विमा कंपनीकडून परिपूर्ण माहिती दिली जात नसेल तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होऊ नये असे आवाहन शेतकऱ्यांना करावे लागेल, असे सभेत स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी व अनियमित झाल्याने भातपिकाचे सुरुवातीलाच पेरणीच्यावेळी नुकसान झाले. त्यानंतर आता भात कापणीवेळी पडलेल्या पावसानेही शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तत्काळ नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी केली. मात्र, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने पंचनामे केलेले नाहीत. मात्र, आदेश प्राप्त होताच नुकसानीचे पंचनामे करू, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावर सभापती रणजित देसाई यांनी झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार करा. तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. नुकसानीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आदेश देतील. तसा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहाच्या भावना कळवा, अशी सूचना दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात आलेले बंधारे आॅक्टोबरमध्येच कोरडे पडलेले दिसत आहेत. तरी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून किती बंधारे बांधले, किती बंधाऱ्यात पाण्याचा साठा झाला आहे याचा अहवाल पुढील सभेत द्या, असे आदेश सभापती रणजित देसाई यांनी संबंधित राज्य कृषी विभागाला दिले. (प्रतिनिधी)