शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पाणलोटच्या १६० बंधाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: February 2, 2015 23:46 IST

कृषी खाते : १५ दिवसात अहवाल देण्याचे आदेश; बंधाऱ्याची निकृष्टता उघड होणार?

रहिम दलाल - रत्नागिरी --शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या १६० बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत बंधाऱ्यांची चौकशी करुन अहवाल सादर करावा, असा आदेश नूतन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या चौकशीत तरी बंधाऱ्यांमधील निकृष्टपणा बाहेर पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. समुद्राचे पाणी शेतात घुसून जमिनी नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, सलग समतल चर, वळण बंधारा, अनगड दगडी बांध आदी बंधाऱ्यांची कामे झाली होती. जिल्ह्यात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात सिमेंटचे १६० बंधारे बांधण्यात आले होते. बंधाऱ्यांच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, ज्या ठिकाणी सिमेेंट बंधारे बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड सुरु होती. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केला होता. जिल्हा परिषद जलसंधारण समिती आणि स्थायी समितीच्या सभेत हे बंधारे प्रकरण जोरदार गाजले होते. त्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाकडून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या सचिवपदी जिल्हा परिषद कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तालुकास्तरावर चौकशी समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पालकमंत्री वायकर जिल्हा दौऱ्यावर आले असताना बंधारे प्रकरण जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. त्यामध्ये विशेष लक्ष घालून त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना बरोबर घेऊन बंधाऱ्यांचा पाहणी दौरा करायचा आहे.निकृष्ट दर्जाच्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करुन येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. जमीन नापीक होण्याची भीतीपाणलोटच्या बंधाऱ्यांची अवस्था अशा प्रकारे वाईट असल्याने हजारो हेक्टर जमीन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांबाबत वेळीच निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.तालुकासिमेंटचे बंधारेगुहागर९चिपळूण५संगमेश्वर२०रत्नागिरी३०राजापूर९०एकूण१६०