शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

विहिरीमधील ‘टीसीएल’ पावडरच्या प्रमाणाची चौकशी

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

शेखर सिंह : साळिस्तेतील साथरोग प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : साळिस्ते येथील उद्भवलेल्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी तेथील पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीमध्ये योग्य प्रमाणात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांनी देखील बुधवारी साळिस्ते गावास भेट दिली. साळिस्ते येथे १२ मे रोजी अतिसाराची लागण झाली होती. या चार-पाच दिवसांत ४८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती व साळिस्ते येथील सर्व पाण्याच्या उद्भवांचे पाणी तपासण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ज्या विहिरींच्या पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे समजले होते, त्या विहिरीतील पाण्याची टी.सी.एल. तपासणी करण्यात आली होती. त्यात पुरेसा २७ टक्के इतका टी.सी.एल.चा अंश टाकण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वी त्या पाण्यात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या पाणीटंचाईच्या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी हा विहिरीतील गाळ काढणे, स्रोतांचे बळकटीकरण करणे, अशा कामांसाठी वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २० कोटी रुपये प्राथमिक निधी दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. मात्र साळिस्ते येथील या कामासाठी तो वापरण्यात आला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपासाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत सुरु असल्याचेही सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र ती भीषण नाही, असे स्पष्ट करत शेखर सिंह म्हणाले की, मागच्यावर्षी कमी पडलेला पाऊस व त्यामुळे कमी झालेला जलसाठा यामुळे थोडी पाण्याची कमतरता जिल्ह्यात जाणवत आहे. मात्र कुठल्याही वाडीत अगदीच पाणी नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात नाही. स्थानिक पातळीवर थोडीबहुत पाण्याची कमतरता आहे हे मान्य करावे लागेल. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती जिल्ह्यात इतरत्र कोठेही नाही. शिक्षक बदल्यांच्या आॅर्डरवर सहीशासनाची २० पटसंख्येच्या आतील शाळा समायोजन करण्याची संकल्पना स्तुत्य आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आर.टी.ई. कायद्यानुसार तीन किलोमीटरच्या टप्प्यात शाळा असणे आवश्यक आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ते थोडे कठीण आहे. तसेच यानुसार कार्यवाही झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे पैसे कोण देणार किंवा कसे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे एका मिटींगनिमित्त गेलो असल्याने शिक्षकांच्या बदल्यांच्या आॅर्डरवर सही करायची राहून गेले होते. त्या आॅर्डरवर मंगळवारी रात्री सह्या केल्या असून, त्या त्या जागेवर शिक्षक नियुक्त होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)