शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
4
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
5
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
6
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
7
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
8
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
9
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
10
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
11
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
12
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
13
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
14
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
15
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
16
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
17
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
18
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
19
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
20
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश

विहिरीमधील ‘टीसीएल’ पावडरच्या प्रमाणाची चौकशी

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

शेखर सिंह : साळिस्तेतील साथरोग प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : साळिस्ते येथील उद्भवलेल्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी तेथील पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीमध्ये योग्य प्रमाणात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांनी देखील बुधवारी साळिस्ते गावास भेट दिली. साळिस्ते येथे १२ मे रोजी अतिसाराची लागण झाली होती. या चार-पाच दिवसांत ४८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती व साळिस्ते येथील सर्व पाण्याच्या उद्भवांचे पाणी तपासण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ज्या विहिरींच्या पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे समजले होते, त्या विहिरीतील पाण्याची टी.सी.एल. तपासणी करण्यात आली होती. त्यात पुरेसा २७ टक्के इतका टी.सी.एल.चा अंश टाकण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वी त्या पाण्यात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या पाणीटंचाईच्या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी हा विहिरीतील गाळ काढणे, स्रोतांचे बळकटीकरण करणे, अशा कामांसाठी वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २० कोटी रुपये प्राथमिक निधी दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. मात्र साळिस्ते येथील या कामासाठी तो वापरण्यात आला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपासाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत सुरु असल्याचेही सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र ती भीषण नाही, असे स्पष्ट करत शेखर सिंह म्हणाले की, मागच्यावर्षी कमी पडलेला पाऊस व त्यामुळे कमी झालेला जलसाठा यामुळे थोडी पाण्याची कमतरता जिल्ह्यात जाणवत आहे. मात्र कुठल्याही वाडीत अगदीच पाणी नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात नाही. स्थानिक पातळीवर थोडीबहुत पाण्याची कमतरता आहे हे मान्य करावे लागेल. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती जिल्ह्यात इतरत्र कोठेही नाही. शिक्षक बदल्यांच्या आॅर्डरवर सहीशासनाची २० पटसंख्येच्या आतील शाळा समायोजन करण्याची संकल्पना स्तुत्य आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आर.टी.ई. कायद्यानुसार तीन किलोमीटरच्या टप्प्यात शाळा असणे आवश्यक आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ते थोडे कठीण आहे. तसेच यानुसार कार्यवाही झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे पैसे कोण देणार किंवा कसे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे एका मिटींगनिमित्त गेलो असल्याने शिक्षकांच्या बदल्यांच्या आॅर्डरवर सही करायची राहून गेले होते. त्या आॅर्डरवर मंगळवारी रात्री सह्या केल्या असून, त्या त्या जागेवर शिक्षक नियुक्त होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)