शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

वनक्षेत्रात खेड अग्रस्थानी

By admin | Updated: December 15, 2015 23:26 IST

जंगल संवर्धन : जंगलाचे पेटंट कायम राखण्यासाठी प्रयत्न गरजेचे

खेड : जंगलांचे संवर्धन योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टीने आणि जंगलाचे पेटंट कायम राहून याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे प्रयत्न कमी पडत आहेत. राज्यात वनक्षेत्राच्या बाबतीत गडचिरोलीनंतर रत्नागिरीचा क्रमांक लागतो. यामध्ये जिल्ह्यातील खेडचा नंबर पहिला असून, जिल्ह्यात मोठे वनक्षेत्र खेडमध्ये असल्याने शासनस्तरावर खेडचे महत्व वाढले आहे.एकीकडे वृक्ष संवर्धनाचे धडे दिले जात असतानाच बेसमुमार वृक्षतोड करण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. वन्य प्राण्यांचे हल्ले अधिक वाढले असून, यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. त्यामुळे वनांचे संवर्धन होणे गरजेचे बनले आहे. मानवी वस्तीत येणाऱ्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी वनांचे संवर्धन झाले पाहिजे. वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांना भक्ष्य मिळणेही मुश्किल झाले आहे. जिल्ह्यातील जंगलांमध्ये लहान जीवांचे रक्षण योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र आहे, तर खेड तालुक्यात सर्वाधिक २५९४ हेक्टर वनक्षेत्र असून, संगमेश्वरमध्ये २६७ हेक्टर आहे. सर्वाधिक वनक्षेत्र खेडमध्ये, तर सर्वात कमी संगमेश्वरमध्ये आहे़ संगमेश्वरमध्ये वनक्षेत्र वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे शासनस्तरावर १९८०मध्ये जंगले वाचवण्यासाठी वनसंवर्धन अधिनियम अस्तित्त्वात आला. या अधिनियमामध्ये जंगले कशी असावीत, याकरिता काही मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत. तर वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीबाबत परवाना देणे अथवा नाकारणे तसेच दंड आकारणे आदी बाबी येतात़ विशेष म्हणजे या अधिनियमामध्ये १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार भारतीय वन अधिनियम १९२७नुसार एकदा तोडलेले जंगल वाहतुकीला परवानगी देता येते. जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत हा विभाग महसूल विभागाकडे येतो़ याशिवाय बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमांद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने सन २००८मध्ये कायदा केला आहे. या कायद्यानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वृक्षांची होणारी बेसुमार तोड थांबवली पाहिजे. त्यासाठी ग्राम पातळीवर कडक धोरण तयार करण्याची गरज आहे, तरच वनांचे संवर्धन होईल. (प्रतिनिधी)योजना केवळ कागदावर : वृक्ष संवर्धन होणे काळाची गरजनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून वृक्ष लागवड केली जाते. मात्र, त्यानंतर त्याचे योग्य प्रकारे संवर्धन होताना दिसत नाही. वृक्ष लागवड करून केवळ प्रसिद्धी मिळवली जाते. पुढील योजनेच्या अंमलबजावणीपर्यंत या झाडांकडे लक्षही दिले जात नाही. त्यामुळे वन संवर्धन योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. वनांच्या संवर्धनासाठी त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे, तरच खऱ्या अर्थाने वन संवर्धनाची योजना यशस्वी होईल.वृक्षतोड रोखादिवसेंदिवस होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे जंगले नष्ट होऊ लागली आहेत. वृक्षतोडीमुळे हिरवाईने नटलेले डोंगर उजाड दिसू लागले आहेत. ही वृक्षतोड रोखण्याची गरज आहे. अन्यथा नैसर्गिक संपत्तीच नष्ट होण्याची भीती आहे.