शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘विकास पेडिया’तून माहितीची देवाणघेवाण

By admin | Updated: February 3, 2015 23:59 IST

भारत सरकारचा उपक्रम : विविध संस्थासाठी रत्नागिरीत कार्यशाळा

रत्नागिरी : सर्वच क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही याचा वापर अत्यल्प होत आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातील विशिष्ट सामाजिक गरजांवर लक्ष केंद्रित करून, त्यासाठी आवश्यक अशी माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘विकास पेडिया’ या भारत सरकारच्या वेब पोर्टलविषयी माहिती देण्यासाठी, आज रत्नागिरीत विविध संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या बहुभाषिक वेबपोर्टलच्या मराठी भाषेतील विभागासाठी पुण्यातील ‘वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट’ या राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्थेची निवड केली आहे. ही संस्था पाणलोट क्षेत्र विकास आणि हवामानातील बदल अनुकुल कार्यक्रम, या क्षेत्रात काम करत आहे. ‘५्र‘ं२स्री्िरं.्रल्ल’ या बहुभाषिक पोर्टलवरून मराठी भाषेतून सहा प्रमुख क्षेत्रांंमधील माहितीची देवाणघेवाण करणे, यासाठी स्वयंसेवक तयार करणे, हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ‘वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट’ आणि येथील समाजभान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे शहरातील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात आयोजन केले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजभानचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये होते. यावेळी व्यासपीठावर हैद्राबाद येथील सीडॅक संस्थेचे राकेशकुमार, तसेच वॉटरशेड आॅर्गनायझेशनच्या निलीमा जोरवर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या वेब पोर्टलवर शासनाच्या योजनांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील इतरही विकासात्मक बाबी जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.नीलिमा जोरवर यांनी प्रस्तावनेत ‘वॉटर’ संस्थेचे कार्य व उद्देश याच्याबद्दल माहिती दिली. अभिजीत हेगशेट्ये यांनी या पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासात्मक बाबी सर्वदूर पोहोचतील, तसेच इतर विषयांची माहिती जिल्ह्याला उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सीडॅक संस्थेचे राकेशकुमार यांनी सीडॅक संस्थेचे कार्य विषद केले. यानंतर कार्यशाळेला प्रारंभ झाला.पहिल्या टप्प्यात नीलिमा जोरवर यांनी ‘विकास पेडिया’ माहितीचे सादरीकरण केले. गट कार्य आणि सादरीकरण करताना कृषी, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ई- प्रशासन, ऊर्जा यावर आधारित सहा गट स्थापन करून, त्यांच्याकडून संबंधित विषयाचे सादरीकरण करून घेतले. यानंतर, उपस्थितांकडून प्रतिक्रिया घेण्यात आले. सूत्रसंचालन यशश्री पुरोहित यांनी केले. आभार युयुत्सु आर्ते यांनी मानले.या कार्यशाळेसाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)