शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

माहिती कार्यालय ६३ वर्षांनी हक्काच्या जागेत...

By admin | Updated: March 1, 2015 23:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबितच

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही नव्या इमारती सज्ज झाल्या असून, काही कार्यालये आता या इमारतीत स्थलांतरित होऊ लागली आहेत. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे भाड्याच्या जागेत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयाला ६३ वर्षांनंतर आता हक्काची जागा मिळाली आहे. गुरुवारपासून हे कार्यालय या नव्या इमारतीत आले आहे. गत वर्षी या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ आॅगस्ट २०१३ रोजी या इमारतींचे उद्घाटन होणार असे म्हटले जात होते. या नव्या दोन इमारतीत कोणकोणती कार्यालये ठेवावी, यांचे वाटपही झाले आहे. या दोन्ही बिल्डींगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डींगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये ठेवण्यात येणार आहेत. ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांचा कारभार या दोन इमारतींमुळे एकछत्री होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना त्यात वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरले. त्यामुळे या दोन्ही इमारती तयार होऊनही त्यात कार्यालये स्थलांतरीत झाली नव्हती.गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय या नव्या इमारतीत आले. मात्र, या दोन्ही इमारतीत विद्युत पुरवठा आणि पाण्याची काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर या बाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नेहमीप्रमाणे सकारात्मक भुमिका घेत बांधकाम विभागाच्या चुका दुरूस्त करून पाणी व विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे आता पहिल्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळापाठोपाठ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पहिल्या मजल्यावर आले आहे, तर गुरूवारपासून जिल्हा माहिती कार्यालयानेही या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर आपल्या नियोजित जागेत पदार्पण केले आहे.सध्या या इमारतींचा विजेचा प्रश्न सुटला असला तरी पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र, लगतच बोअरवेल खोदण्यात आली असून, तिथून या सर्व कार्यालयांना दोन - तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. काही कार्यालयांना या इमारतीत स्थलांतरीत होण्यासाठी, तसेच फर्निचर आदी खर्चासाठी निधी मंजूर झाला नसल्याने त्यांचे स्थलांतर लांबणार असल्याचे मत काहीनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)