शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

हापूसच्या आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 9, 2015 01:21 IST

संमिश्र हवामान : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

रत्नागिरी : उष्णता, थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आंबा पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रियेलाही विलंब झाला. एप्रिलपर्यंत जो आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती, तोच आंबा गळून पडला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी अचानक कमी झाली आहे. शिवाय उकाडा वाढला आहे. त्यामुळे सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांकडून फळांच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र, नैसर्गिक प्रकोपामुळे संबंधित खर्च वाया जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक फळांची गळ झालेली दिसून येत आहे.सध्या सर्वत्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सध्या झाडावर जेमतेम २० ते २५ टक्के आंबा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संबंधित आंबा थ्रीप्सपासून वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. शेवटच्या मोहोराला फळधारणा झाली असली तरी हा आंबा तयार होण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्याला भाव मिळणे अवघड होणार आहे. दरवर्षी विविध कारणांनी आंबापीक धोक्यात येऊ लागले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप आंबा - काजू मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंब्याला योग्य भाग मिळणे अपेक्षित आहे. मँगोनेट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप संबंधित योजनेविषयी शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संबंधित योजना सुस्पष्ट करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महागडी औषधे फवारणी करण्याची सूचना केली जात असताना फळगळ किंवा अन्य समस्यांवर मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)