शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

हापूसच्या आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 9, 2015 01:21 IST

संमिश्र हवामान : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

रत्नागिरी : उष्णता, थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आंबा पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रियेलाही विलंब झाला. एप्रिलपर्यंत जो आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती, तोच आंबा गळून पडला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी अचानक कमी झाली आहे. शिवाय उकाडा वाढला आहे. त्यामुळे सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांकडून फळांच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र, नैसर्गिक प्रकोपामुळे संबंधित खर्च वाया जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक फळांची गळ झालेली दिसून येत आहे.सध्या सर्वत्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सध्या झाडावर जेमतेम २० ते २५ टक्के आंबा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संबंधित आंबा थ्रीप्सपासून वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. शेवटच्या मोहोराला फळधारणा झाली असली तरी हा आंबा तयार होण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्याला भाव मिळणे अवघड होणार आहे. दरवर्षी विविध कारणांनी आंबापीक धोक्यात येऊ लागले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप आंबा - काजू मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंब्याला योग्य भाग मिळणे अपेक्षित आहे. मँगोनेट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप संबंधित योजनेविषयी शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संबंधित योजना सुस्पष्ट करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महागडी औषधे फवारणी करण्याची सूचना केली जात असताना फळगळ किंवा अन्य समस्यांवर मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)