शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

हापूसच्या आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 9, 2015 01:21 IST

संमिश्र हवामान : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

रत्नागिरी : उष्णता, थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आंबा पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रियेलाही विलंब झाला. एप्रिलपर्यंत जो आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती, तोच आंबा गळून पडला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी अचानक कमी झाली आहे. शिवाय उकाडा वाढला आहे. त्यामुळे सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांकडून फळांच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र, नैसर्गिक प्रकोपामुळे संबंधित खर्च वाया जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक फळांची गळ झालेली दिसून येत आहे.सध्या सर्वत्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सध्या झाडावर जेमतेम २० ते २५ टक्के आंबा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संबंधित आंबा थ्रीप्सपासून वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. शेवटच्या मोहोराला फळधारणा झाली असली तरी हा आंबा तयार होण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्याला भाव मिळणे अवघड होणार आहे. दरवर्षी विविध कारणांनी आंबापीक धोक्यात येऊ लागले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप आंबा - काजू मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंब्याला योग्य भाग मिळणे अपेक्षित आहे. मँगोनेट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप संबंधित योजनेविषयी शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संबंधित योजना सुस्पष्ट करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महागडी औषधे फवारणी करण्याची सूचना केली जात असताना फळगळ किंवा अन्य समस्यांवर मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)