शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी उपोषण, तळमळ की अडवणूक ?

By admin | Updated: August 14, 2015 00:01 IST

महत्त्व लोप पावण्याची भीती : प्रशासन वेठीस

राजन वर्धन - सावंतवाडी  -देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन शनिवारी साजरा होत आहे. देशातील जनतेचा सर्वांत आनंदाचा दिवस म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण या दिवशी करण्यात येणारी विविध आंदोलने, उपोषणे यामुळे स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय करण्यात येणारी ही आंदोलने संबंधित मागण्यांसाठी तळमळ आहे की, कोणाची अडवणूक आहे, याबाबत शंका उपस्थित होत असली तरी यामुळे प्रशासन मात्र वेठीस धरले जात आहे. राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिनाला देशात मानाचे स्थान आहे. शिवाय शेजारील देशांसह जगातही भारताच्या स्वातंत्र्य दिनाविषयी कुतूहल आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले. अनेकांनी कारावास भोगला, तर अनेकांना भूमिगतही व्हावे लागले; पण याची कसलीही तमा न बाळगता या सर्वांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता केली. हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून शाळा, महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयासमोर तिरंगा ध्वज फडकवून साजरा केला जातो. या दिवशी शासकीय व अलीकडे खासगी क्षेत्रातही सुटी जाहीर झाली करण्यात आली आहे. जेणेकरून हा दिवस सर्वांनी आनंदात घालवावा.पण, देशवासियांच्या या आनंदाच्या दिवशी आंदोलने करण्याचे प्रकार गेल्या तीन-चार वर्र्षात वाढले आहेत. व्यक्तिगत, सामाजिक व सार्वजनिक मागण्यांसाठी विविध आंदोलने करण्याचे इशारे दिले जात आहेत. तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी व आता खुद्द विधिमंडळातसुद्धा याचे पेव पसरत आहे.सावंतवाडी तहसीलदारांकडे या स्वातंत्र्य दिनादिवशी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दहाजणांनी केवळ उपोषण करण्यासाठी इशारा दिला आहे. यामध्ये साटेली-भेडशीतील जाधव व दलित बांधव, सावंतवाडीतील चराठा-नमसवाडी येथील शंकर कोठावळे, डेगवेतील संजय देसाई, तळवणेतील वासुदेव जाधव, सावंतवाडी-सालईवाडा येथील सूर्यकांत गवंडे, माणगाव येथील बी. पी. कांबळे, आंबेगाव येथील दक्षता परब, सावंतवाडी-वैश्यवाडा येथील प्रदीप नाईक, न्हावेलीतील सद्गुरू सावळ यांचा समावेश आहे. तर सावंतवाडी प्रांत कार्यालयाकडे सावंतवाडी तालुक्यातील पाच, दोडामार्ग तालुक्यातील तीन, तर कुडाळ तालुक्यातील एक असे नऊ उपोषणाचे इशारे आले आहेत. वास्तविक पाहता उपोषण करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असतीलही; पण स्वातंत्र्य दिनाला उपोषणासारखा गंभीर आंदोलनाचा मार्ग पत्करणे योग्य नाही. तर या मागण्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली टाळाटाळही तितकीच गंभीर आहे. या अधिकाऱ्यांनाही वरिष्ठांनी चाप बसविणे गरजेचे आहे. एकीकडे ‘देशाचा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो’ म्हणायचे आणि दुसरीकडे येथील नागरिक व अधिकाऱ्यांनी यादिवशी उपोषणासारखे कृत्य करणे अशोभनीय असेच आहे. एकंदरीत यामुळे शालेय मुलांना आपण या दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पहाटे उठवून त्याला नटवून शाळेत पाठवतो. पण, या दिनाचे महत्त्व आपणांकडून धुळीस मिळविले जाऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा देशाच्या आनंदाच्या या दिवसाचे महत्त्व भविष्यात लोप पावण्याचीही भीती आहे. ग्रामसभाही वादळी : प्रशासनाची कोंडीया राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभाही आयोजित केली जाते. अलीकडे सर्वच गावातील ग्रामसभांमध्ये वादावादी होत असल्याचे प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. त्यामुळे ज्या आनंदोत्सवासाठी हा दिवस असतो त्या आनंदाऐवजी हा दिवस वादाचा होतो. त्यामुळे प्रशासन, त्यातही पोलीस प्रशासनाची फार मोठी कोंडी होते.