शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिक्षणाचे व्यापारीकरण वाढतेय

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

भालचंद्र मुणगेकर : कुडाळ येथील चर्चासत्रात मार्गदर्शन

कुडाळ : शिक्षण क्षेत्राच्या खासगीकरणाबरोबरच व्यापारीकरण वाढत असल्याने यापुढे ज्याच्या हातात काळा पैसा नाही, ती व्यक्ती आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकणार नाही. शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणामुळे हे चित्र भविष्यात दिसून येणार असल्याची खंत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘आजच्या शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान आणि खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. बॅ. नाथ पै बी.एड्. कॉलेज व बॅ. नाथ पै कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजच्या शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने’ या विषयावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा खासदार, देशाचे नियोजन मंडळाचे सदस्य, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे गुरुवारी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी कुमार कदम, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, गोगटे वाळके कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत, कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वजराटकर, माणगाव हायस्कूलचे प्राचार्य प्रशांत धोंड, श्री देवी सातेरी हायस्कूल आणि गुलाबबाई नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्वाती वालावलकर, आदी उपस्थित होते.डॉ. मुणगेकर म्हणाले, १८८५ पासून भारताच्या शिक्षणाचे शिल्पकार लॉर्ड मेकॉले त्यांनी कारकुनी थाटाचे शिक्षण सुरू केले. १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी थोडा बदल करून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. आपल्याकडे गरीब लोक शिक्षण घेऊ शकले याचे कारण फुले, आंबेडकर आणि शाहू यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळी. या देशातील स्त्रियांनी केलेली प्रगती ही सर्वांत मोठी प्रगती आहे. आजच्या शिक्षण पद्धतीबाबत ते म्हणाले, आज शिक्षणाचे बाजारीकरण आणि खासगीकरण झाले आहे.बाजारीकरणामुळे एमडीसाठी आज एक ते दीड कोटी रुपये फी म्हणून मागितले जातात. याचा परिणाम म्हणजे ज्याच्याजवळ पैसे नाहीत, तो पालक आपल्या पाल्याला उच्च व्यावसायिक शिक्षण देऊ शकणार नाही. काही लोक इतर शिक्षणातून मिळालेले पैसे दुसरीकडे वापरतात, अशी स्थिती आहे. आज शिक्षण व्यवस्थेत शारीरिक श्रमाला महत्त्व नाही, ही शोकांतिका आहे. आज सरकारचा उच्च शिक्षणावरचा खर्च कमी होत चालला आहे. यात सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. देशात सरकार आणि राजकारण या गोष्टी अपरिहार्य आहेत. आपला आशावाद मोठा पाहिजे. यासंदर्भात ते म्हणाले, नेपोलियनचा साम्राज्यवाद जेवढा मोठा होता, तेवढाच छोटेसे राज्य असूनही शिवाजी महाराजांचा साम्राज्यवाद मोठा आहे. खासगीकरण, बाजारीकरण, गुणवत्तेचा अभाव, बंधुभावाचा अभाव अशा प्रकारची आव्हाने आजच्या शिक्षण पद्धतीसमोर आहेत. याला पर्याय म्हणून नवीन राष्ट्रवाद, व्यावसायिक शिक्षण, स्त्री -पुरुष समानता अशी शिक्षण पद्धती असावी. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, अशी सामाजिक जाणीव शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे. सामाजिक भावना हा विकासशील मानवी जीवनाचा आत्मा आहे. यानंतर झालेल्या चर्चासत्रातील प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा; पण टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊ नये. तसेच पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी उत्तेजन द्यावे; पण अभ्यासक्रम त्यांच्यावर लादू नये. याबाबत त्यांना उद्बोधन करण्याची गरज आहे. अजूनही देशातील अनेक गावांमध्ये तंत्रज्ञान पोहोचलेले नाही, असेही ते म्हणाले. तसेच खासदार मुणगेकर म्हणाले, खासगीकरण, उच्च शिक्षणासाठी समर्थनीय आहे. मात्र, व्यापारीकरण होऊ नये. शिक्षण व्यवस्थेचा उपयोग सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे. भारतात सोडून जगात बी.कॉम. ही डिग्री नाही. तर अमेरिका देशात प्यून हे पद नाही. स्वत:ची कामे स्वत: करता आली पाहिजेत, असे ते म्हणाले. यावेळी बी. एड्.च्या प्राचार्या दीपाली काजरेकर, नागराज सुनगार, प्रा. रूपाली नार्वेकर, पौर्णिमा दाभोलकर, प्रा. सचिन पाटकर, आदी उपस्थित होते. पौर्णिमा दाभोलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर श्वेता खानोलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)