शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल

By admin | Updated: November 20, 2014 00:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शहरी भागात १0 टक्के तर ग्रामीण भागात ५ टक्के दरे

सिंधुदुर्गनगरी : सन २०१२ मध्ये शासकीय जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल्याने पुढील वर्षासाठी शासकीय जमिनीच्या दरात वाढ करू नये, या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार शहरी भागात १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्यांचे दर वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली.शासकीय जमिनीचे बाजारमूल्य ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, कणकवली नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगररचनाकार अधिकारे आदी उपस्थित होते. २०१२ मध्ये शासकीय जमिनींचे बाजारमूल्य ठरविताना तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात दुपटीने वाढ केली होती. या निर्णयामुळे बिल्डर असोसिएशनमधून यावेळी आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाचा महसूल वाढला होता. मात्र, जमिनींचे व्यवहार कमी झाले होते. आता पुढील वर्षासाठी शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीचे बाजारमूल्य वाढवू नये, अशी मागणी बिल्डर तसेच लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आली होती. याचा सारासार विचार करून आगामी वर्षासाठी शहरी भागामध्ये १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रवीेद्रन यांनी दिली.जिल्हा नियोजन विभागाचा सन २०१५-१६चा आराखडा शासनास सादर केला आहे. हा आराखडा १२० कोटी, १५० कोटी व तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटी अशा एकूण ३ टप्प्यात पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मान्यता मिळणार आहे. तर सन २०१४-१५ साठीचे मंजूर झालेल्या १०० कोटींपैकी अजूनपर्यंत ६० कोटी रूपये जिल्हा नियोजन विभागास प्राप्त झाले असून उर्वरित ४० कोटीचा निधी हिवाळी अधिवेशनानंतर मिळणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सिंधु महोत्सवाची तयारी सुरूडिसेंबरअखेर प्रशासनामार्फत मालवणमध्ये सिंधु महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्याची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. या सिंधु महोत्सवासाठी ७० ते ८० लाख रूपये खर्च अपेक्षित असून हा खर्च जिल्हा नियोजन विभाग ३० लाख, शासनाकडून ४० लाख, यु.एन.डी.पी. १० लाख, जिल्हा परिषद १० लाख असा निधी उभा केला जाणार आहे. या सिंधु महोत्सवामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास आणखीन मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.