शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेलिंगची उंची वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

बंदी घाला : कावळेसाद ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्च करून आंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेली रेलिंग कमी उंचीची आहेत. यामुळे गतवर्षी दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला सर्वस्वी बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत कावळेसादमधील रेलिंगची उंची वाढविण्याची कामे करा; अन्यथा या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी करावी, अशी मागणी गुरुवारी कावळेसादसह आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांनी चुकीच्या कामांविरोधातही वेळोवेळी सूचना व आंदोलने केली आहे. मात्र, त्यानंतरही ही कामे त्याच पद्धतीने सुरू राहिली. कावळेसाद पॉर्इंटवर बांधकाम विभागाने रेलिंग उभी केली आहेत. या रेलिंगची उंची कमी असून, या रेलिंगमुळे एखादा पर्यटक जर कावळेसादच्या दरीचा आस्वाद घेण्यास उभा राहिला, तरीही तो तोल जाऊन दरीत पडू शकतो, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. गतवर्षी विजापूर व कोल्हापूर येथील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कावळेसाद येथे आले असता त्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच येथील डोंगरावरील पाणी मोठ्या पाईपद्वारे दरीत सोडण्यात येते. त्या मोठ्या पाईपना जाळ्या नसल्याने हा पर्यटक थेट त्या पाईपमधून वाहून जाऊन दरीत कोसळला होता. या प्रकारामुळे पाईपना जाळी बसवण्याबरोबरच रेलिंगची उंची वाढवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)जाळी बसविण्याची मागणीआंबोली परिसरात हजारो पर्यटक पर्यटनासाठी दाखल होत असतात. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या ठिकाणी योग्य उपाययोजना न केल्यास पर्यटकांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित पर्यटनासाठी कावळेसाद पॉर्इंट निर्भय करण्यासाठी या रेलिंगची उंची वाढवण्याची व जाळी बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली आहे.