शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

रेलिंगची उंची वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

बंदी घाला : कावळेसाद ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्च करून आंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेली रेलिंग कमी उंचीची आहेत. यामुळे गतवर्षी दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला सर्वस्वी बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत कावळेसादमधील रेलिंगची उंची वाढविण्याची कामे करा; अन्यथा या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी करावी, अशी मागणी गुरुवारी कावळेसादसह आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांनी चुकीच्या कामांविरोधातही वेळोवेळी सूचना व आंदोलने केली आहे. मात्र, त्यानंतरही ही कामे त्याच पद्धतीने सुरू राहिली. कावळेसाद पॉर्इंटवर बांधकाम विभागाने रेलिंग उभी केली आहेत. या रेलिंगची उंची कमी असून, या रेलिंगमुळे एखादा पर्यटक जर कावळेसादच्या दरीचा आस्वाद घेण्यास उभा राहिला, तरीही तो तोल जाऊन दरीत पडू शकतो, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. गतवर्षी विजापूर व कोल्हापूर येथील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कावळेसाद येथे आले असता त्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच येथील डोंगरावरील पाणी मोठ्या पाईपद्वारे दरीत सोडण्यात येते. त्या मोठ्या पाईपना जाळ्या नसल्याने हा पर्यटक थेट त्या पाईपमधून वाहून जाऊन दरीत कोसळला होता. या प्रकारामुळे पाईपना जाळी बसवण्याबरोबरच रेलिंगची उंची वाढवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)जाळी बसविण्याची मागणीआंबोली परिसरात हजारो पर्यटक पर्यटनासाठी दाखल होत असतात. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या ठिकाणी योग्य उपाययोजना न केल्यास पर्यटकांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित पर्यटनासाठी कावळेसाद पॉर्इंट निर्भय करण्यासाठी या रेलिंगची उंची वाढवण्याची व जाळी बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली आहे.