शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

रेलिंगची उंची वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

बंदी घाला : कावळेसाद ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्च करून आंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेली रेलिंग कमी उंचीची आहेत. यामुळे गतवर्षी दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला सर्वस्वी बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत कावळेसादमधील रेलिंगची उंची वाढविण्याची कामे करा; अन्यथा या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी करावी, अशी मागणी गुरुवारी कावळेसादसह आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांनी चुकीच्या कामांविरोधातही वेळोवेळी सूचना व आंदोलने केली आहे. मात्र, त्यानंतरही ही कामे त्याच पद्धतीने सुरू राहिली. कावळेसाद पॉर्इंटवर बांधकाम विभागाने रेलिंग उभी केली आहेत. या रेलिंगची उंची कमी असून, या रेलिंगमुळे एखादा पर्यटक जर कावळेसादच्या दरीचा आस्वाद घेण्यास उभा राहिला, तरीही तो तोल जाऊन दरीत पडू शकतो, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. गतवर्षी विजापूर व कोल्हापूर येथील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कावळेसाद येथे आले असता त्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच येथील डोंगरावरील पाणी मोठ्या पाईपद्वारे दरीत सोडण्यात येते. त्या मोठ्या पाईपना जाळ्या नसल्याने हा पर्यटक थेट त्या पाईपमधून वाहून जाऊन दरीत कोसळला होता. या प्रकारामुळे पाईपना जाळी बसवण्याबरोबरच रेलिंगची उंची वाढवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)जाळी बसविण्याची मागणीआंबोली परिसरात हजारो पर्यटक पर्यटनासाठी दाखल होत असतात. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या ठिकाणी योग्य उपाययोजना न केल्यास पर्यटकांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित पर्यटनासाठी कावळेसाद पॉर्इंट निर्भय करण्यासाठी या रेलिंगची उंची वाढवण्याची व जाळी बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली आहे.