शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

रेलिंगची उंची वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

बंदी घाला : कावळेसाद ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्च करून आंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेली रेलिंग कमी उंचीची आहेत. यामुळे गतवर्षी दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला सर्वस्वी बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत कावळेसादमधील रेलिंगची उंची वाढविण्याची कामे करा; अन्यथा या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी करावी, अशी मागणी गुरुवारी कावळेसादसह आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांनी चुकीच्या कामांविरोधातही वेळोवेळी सूचना व आंदोलने केली आहे. मात्र, त्यानंतरही ही कामे त्याच पद्धतीने सुरू राहिली. कावळेसाद पॉर्इंटवर बांधकाम विभागाने रेलिंग उभी केली आहेत. या रेलिंगची उंची कमी असून, या रेलिंगमुळे एखादा पर्यटक जर कावळेसादच्या दरीचा आस्वाद घेण्यास उभा राहिला, तरीही तो तोल जाऊन दरीत पडू शकतो, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. गतवर्षी विजापूर व कोल्हापूर येथील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कावळेसाद येथे आले असता त्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच येथील डोंगरावरील पाणी मोठ्या पाईपद्वारे दरीत सोडण्यात येते. त्या मोठ्या पाईपना जाळ्या नसल्याने हा पर्यटक थेट त्या पाईपमधून वाहून जाऊन दरीत कोसळला होता. या प्रकारामुळे पाईपना जाळी बसवण्याबरोबरच रेलिंगची उंची वाढवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)जाळी बसविण्याची मागणीआंबोली परिसरात हजारो पर्यटक पर्यटनासाठी दाखल होत असतात. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या ठिकाणी योग्य उपाययोजना न केल्यास पर्यटकांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित पर्यटनासाठी कावळेसाद पॉर्इंट निर्भय करण्यासाठी या रेलिंगची उंची वाढवण्याची व जाळी बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली आहे.