शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आधुनिक शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:45 IST

वैभव नाईक : सिंधु कृषी महोत्सवास प्रारंभ, २२ पर्यंत विविध कार्यक्रम

ओरोस : शेतीबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी विषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम बनवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी सिंधु कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय आयोजित सिंधु कृषी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ओरोस फाटा तर ओरोस फाटा ते शरद कृषी भवन येथे शिवज्योत आणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी गडहिंग्लजच्या लेझीम पथकाने आपल्या कलाकौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी पडीक ठेवत आहेत. शेती सोडून नोकरीकडे त्यांचे लक्ष केंद्रीय झाले आहे. परिणामी शेतजमिनींच्या पडीक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांमध्ये शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी प्रतिष्ठान किर्लोसच्यावतीने १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कृषीविषयक प्रशिक्षणे व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करा. या शेतीतून आर्थिक उन्नती साधा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवा असे आवाहन केले.सुधीर सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यास आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. उत्पादन क्षमता व कृषीमालाचा दर्जा वाढविल्यावरच कृषी मालातून मिळणारे उत्पन्न वाढू शकते. तसेच बरेच शेतजमिनींचे मालक शहरात रहात असल्याने असल्या शेतजमिनी विकत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेती टिकावी, शेतकरी रहावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने कृषी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. ज्या शेतकऱ्यांना शेती करणे शक्य नाही त्यांच्या शेतात त्यांच्याच सहभागाने कृषी प्रतिष्ठान जमिनी नांगराखाली आणेल. यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, ऊस लागवड, कृषी माल प्रक्रिया व विक्री तसेच महिला सक्षमीकरण आदींचा विशेष समावेश असणार असून यासाठीच सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)