शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

महावितरण कंपनी : दिवसाला लागतेय १८० मेगावॅट वीज

रत्नागिरी : गेल्या पाच वर्षात वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. शिवाय उकाडा वाढल्यामुळेही विजेच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. उकाडा वाढल्यामुळे मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७४ हजार ५९ घरगुती ग्राहक आहेत, तर ७,७२८ वाणिज्यीक, तसेच ८१६ औद्योगिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ९७० ग्राहकांकडून ६३ कोटी १५ लाख ५६ हजार ७३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी महावितरणला ४९४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वीज ग्राहकही वाढत आहेत. शिवाय महावितरणच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याला १६५ ते १७० मेगावॅट इतकी वीज लागत असे. त्यामध्ये आता वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांचा आढावा घेतला तर दरवर्षी दीड ते दोन हजार ग्राहक वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण अल्प आहे. शिवाय वसुलीही चांगली आहे. महावितरणने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक आणि आर्थिक वसुली कमी असलेल्या फिडरची वर्गवारी करून भारनियमनाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील फिडर्स अ, ब, क गटात येत असल्यामुळे भारनियमन बंद आहे.मागणी वाढल्यामुळे गतवर्षी मे महिन्यात काही ठराविक तासांसाठी राज्यात सक्तीचे भारनियमन करण्यात आले होते. राज्यात सक्तीचे भारनियमन राबविण्यात येते, त्यावेळी जिल्ह्याला त्याचा फटका बसत असला तरी सध्या जिल्ह्यात भारनियमन मात्र बंद आहे.परंतु रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या तसेच जिल्ह्याचा विस्तार वाढत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढत आहे. त्याचबरोबर सध्या उष्मा जास्त जाणवत असल्याने जिल्ह्यात वीजेची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)