शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जिल्ह्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

महावितरण कंपनी : दिवसाला लागतेय १८० मेगावॅट वीज

रत्नागिरी : गेल्या पाच वर्षात वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. शिवाय उकाडा वाढल्यामुळेही विजेच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. उकाडा वाढल्यामुळे मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७४ हजार ५९ घरगुती ग्राहक आहेत, तर ७,७२८ वाणिज्यीक, तसेच ८१६ औद्योगिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ९७० ग्राहकांकडून ६३ कोटी १५ लाख ५६ हजार ७३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी महावितरणला ४९४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वीज ग्राहकही वाढत आहेत. शिवाय महावितरणच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याला १६५ ते १७० मेगावॅट इतकी वीज लागत असे. त्यामध्ये आता वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांचा आढावा घेतला तर दरवर्षी दीड ते दोन हजार ग्राहक वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण अल्प आहे. शिवाय वसुलीही चांगली आहे. महावितरणने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक आणि आर्थिक वसुली कमी असलेल्या फिडरची वर्गवारी करून भारनियमनाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील फिडर्स अ, ब, क गटात येत असल्यामुळे भारनियमन बंद आहे.मागणी वाढल्यामुळे गतवर्षी मे महिन्यात काही ठराविक तासांसाठी राज्यात सक्तीचे भारनियमन करण्यात आले होते. राज्यात सक्तीचे भारनियमन राबविण्यात येते, त्यावेळी जिल्ह्याला त्याचा फटका बसत असला तरी सध्या जिल्ह्यात भारनियमन मात्र बंद आहे.परंतु रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या तसेच जिल्ह्याचा विस्तार वाढत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढत आहे. त्याचबरोबर सध्या उष्मा जास्त जाणवत असल्याने जिल्ह्यात वीजेची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)