शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: February 19, 2015 23:45 IST

तिलारी प्रकल्प : ओटवणेत पाणी साठवणूक नाही, उन्हाळ्यात पाण्याची बोंब

महेश चव्हाण - ओटवणे तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्यांची कामे पद्धतशीर न झाल्याने ओटवणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आधीच वन्यप्राण्यांच्या समस्येला त्रासलेल्या शेतकऱ्यांना पावसात शेतात पाणी जात असल्याने नुकसानीस सामोरे जावे लागते. तर उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी साठत नसल्याने शेतीला लागणारे मुबलक पाणी प्राप्त होत नाही. वन्यप्राण्यांचा त्रास व उन्हाळ्यात मुबलक पाणी नसणे, या गोष्टी शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. ओटवणे गावात तिलारीच्या कालव्यांतून पाणी खेळणार यामुळे शेतकरीवर्ग आनंदात होता. मात्र, बरीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही ओटवणेवासीयांना या पाण्याची प्रतीक्षा कायम राहिलेली आहे. तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालवा हा ओटवणे गावच्या मध्यावरुन जात आहे. हरितक्रांतीच्या उद्देशाने उभारलेल्या या कालव्यात मात्र, मागील दहा वर्षात तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. परंतु, या प्रकल्पांच्या कामांमुळे ओटवणेतील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ओटवणे मांडवफातरवाडी भागात गतवर्षी कालवे नादुरुस्ती स्थितीमुळे पाण्याने पूर्ण भरले जात होते. डोंगरभागावरुन वाहत येणाऱ्या पाण्याला पलिकडे जाण्यासाठी वाटच उपलब्ध नसल्याने स्थानिकांना कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागले होते. कालव्यात साठलेले पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत शेतांमध्ये घुसले होते. पावसात पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरांमध्येही ओल आली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर यावर्षी पाईप टाकून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ओटवणे गावातील काही भागात अशा प्रकारच्या उपाययोजना न केल्याने पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सुरुच होते. त्यामुळे कालव्याच्या पलिकडच्या शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे या शेतकऱ्यांना लावणीसाठीही पाणी मिळाले नव्हते ही पावसाळ्यातील स्थिती असते. तर उन्हाळ्यात कालव्याच्या दोन्हीकडील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाण्याचा तुटवडा भासतो. यातून मार्ग काढण्याची खरी गरज आहे. एकीकडे गवारेडा, माकड यासारख्या वन्य प्राण्यांच्या रोजच्याच त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच करायची नाही का, असा सवाल करत वन्यप्राण्यांच्या प्रश्नासह पाण्याचा प्रश्नही सोडविण्याची मागणी केली आहे. पाणी नसल्यास शेतकरी काहीच करु शकत नाही. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बारमाही शेती होऊ शकते अशा शेतजमिनी असतानाही शेतकऱ्यांना या समस्यांमुळे हातावर हात ठेऊन बसावे लागत आहे. दुरूस्ती कामांमध्ये वाढ, मात्र ती अपूर्णतिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याचे मुख्य हौदे उघडे असल्याने पाण्याने वाहत येणारे दगड, माती, लाकडे, प्लास्टिक आदी कचराही कालव्यातून वाहत येत आहे.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पुढीलवर्षीही या कालव्यांची दुरुस्ती आवश्यक बनणार असून ठेकेदारांसाठी दरवर्षी दुरुस्तीसाठी येणारे कालवे लाभदायक ठरत आहेत. आणि शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कामे आवरा, म्हणण्याची वेळ आहे.पाण्याची चाचणीदेखील नाहीतिलारीच्या पाण्याला ओटवणे येथे आणण्यासाठी तिलारी प्रकल्पाव्दारे प्रयत्न केले जाता आहेत. मात्र, कालव्यांच्या कामांच्या फेऱ्यात अडकलेल्या तिलारी विभागाने ओटवणे येथे प्रायोगिक तत्वावरही पाणी पोहचते का नाही, याची चाचणी घेतलेली नाही. त्यामुळे या कामांबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.पाणी साठवणूक नाहीतिलारीच्या कालव्यांची ओटवणेतील कामे निकृष्ट दर्जाची असल्याने पाणी साठवणूक क्षमता या कालव्यांमध्ये नाही. कालव्याच्या हौद्याचे बांधकाम पूर्णत: सिमेंट काँक्रिटचे असल्याने जमिनीत पाणी जिरुन पाण्याची पातळी वाढण्याची शक्यताही नाही.