शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: February 19, 2015 23:45 IST

तिलारी प्रकल्प : ओटवणेत पाणी साठवणूक नाही, उन्हाळ्यात पाण्याची बोंब

महेश चव्हाण - ओटवणे तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्यांची कामे पद्धतशीर न झाल्याने ओटवणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आधीच वन्यप्राण्यांच्या समस्येला त्रासलेल्या शेतकऱ्यांना पावसात शेतात पाणी जात असल्याने नुकसानीस सामोरे जावे लागते. तर उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी साठत नसल्याने शेतीला लागणारे मुबलक पाणी प्राप्त होत नाही. वन्यप्राण्यांचा त्रास व उन्हाळ्यात मुबलक पाणी नसणे, या गोष्टी शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. ओटवणे गावात तिलारीच्या कालव्यांतून पाणी खेळणार यामुळे शेतकरीवर्ग आनंदात होता. मात्र, बरीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतरही ओटवणेवासीयांना या पाण्याची प्रतीक्षा कायम राहिलेली आहे. तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालवा हा ओटवणे गावच्या मध्यावरुन जात आहे. हरितक्रांतीच्या उद्देशाने उभारलेल्या या कालव्यात मात्र, मागील दहा वर्षात तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. परंतु, या प्रकल्पांच्या कामांमुळे ओटवणेतील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ओटवणे मांडवफातरवाडी भागात गतवर्षी कालवे नादुरुस्ती स्थितीमुळे पाण्याने पूर्ण भरले जात होते. डोंगरभागावरुन वाहत येणाऱ्या पाण्याला पलिकडे जाण्यासाठी वाटच उपलब्ध नसल्याने स्थानिकांना कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागले होते. कालव्यात साठलेले पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत शेतांमध्ये घुसले होते. पावसात पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरांमध्येही ओल आली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर यावर्षी पाईप टाकून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ओटवणे गावातील काही भागात अशा प्रकारच्या उपाययोजना न केल्याने पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सुरुच होते. त्यामुळे कालव्याच्या पलिकडच्या शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे या शेतकऱ्यांना लावणीसाठीही पाणी मिळाले नव्हते ही पावसाळ्यातील स्थिती असते. तर उन्हाळ्यात कालव्याच्या दोन्हीकडील शेतकऱ्यांना शेतीकरिता पाण्याचा तुटवडा भासतो. यातून मार्ग काढण्याची खरी गरज आहे. एकीकडे गवारेडा, माकड यासारख्या वन्य प्राण्यांच्या रोजच्याच त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच करायची नाही का, असा सवाल करत वन्यप्राण्यांच्या प्रश्नासह पाण्याचा प्रश्नही सोडविण्याची मागणी केली आहे. पाणी नसल्यास शेतकरी काहीच करु शकत नाही. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बारमाही शेती होऊ शकते अशा शेतजमिनी असतानाही शेतकऱ्यांना या समस्यांमुळे हातावर हात ठेऊन बसावे लागत आहे. दुरूस्ती कामांमध्ये वाढ, मात्र ती अपूर्णतिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याचे मुख्य हौदे उघडे असल्याने पाण्याने वाहत येणारे दगड, माती, लाकडे, प्लास्टिक आदी कचराही कालव्यातून वाहत येत आहे.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पुढीलवर्षीही या कालव्यांची दुरुस्ती आवश्यक बनणार असून ठेकेदारांसाठी दरवर्षी दुरुस्तीसाठी येणारे कालवे लाभदायक ठरत आहेत. आणि शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना कामे आवरा, म्हणण्याची वेळ आहे.पाण्याची चाचणीदेखील नाहीतिलारीच्या पाण्याला ओटवणे येथे आणण्यासाठी तिलारी प्रकल्पाव्दारे प्रयत्न केले जाता आहेत. मात्र, कालव्यांच्या कामांच्या फेऱ्यात अडकलेल्या तिलारी विभागाने ओटवणे येथे प्रायोगिक तत्वावरही पाणी पोहचते का नाही, याची चाचणी घेतलेली नाही. त्यामुळे या कामांबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.पाणी साठवणूक नाहीतिलारीच्या कालव्यांची ओटवणेतील कामे निकृष्ट दर्जाची असल्याने पाणी साठवणूक क्षमता या कालव्यांमध्ये नाही. कालव्याच्या हौद्याचे बांधकाम पूर्णत: सिमेंट काँक्रिटचे असल्याने जमिनीत पाणी जिरुन पाण्याची पातळी वाढण्याची शक्यताही नाही.