शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

कुडाळातील घटना : रेल्वे ट्रॅकवर नीस टाकणाऱ्यांना शिक्षा आवश्यक

By admin | Updated: September 1, 2014 00:00 IST

'त्या' घटनेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे-रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेतही त्रुटी

कुडाळ : कोकण रेल्वेवर एक ना दोन अशी अनेक विघ्ने येत आहेत. मार्गावरील कोसळणाऱ्या दरडीचे संकट असतानाच कुडाळ येथील रेल्वे ट्रॅकवर अज्ञाताकडून दुर्घटना घडण्यासाठी सिमेंटचे नीस टाकण्यात आले. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत समाजातील विकृतीला समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा कोकण रेल्वेचा प्रवास भविष्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांकरिता जीवघेणा ठरु शकतो. या विकृतीला लवकरात लवकर नष्ट करणे गरजेचे आहे.कुडाळातील झाराप मुस्लिमवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर २९ आॅगस्ट रोजी अज्ञात व्यक्तींकडून सिमेंटचे नीस टाकण्यात आले होते. अपघात व्हावा, या दृष्टीकोनातून टाकण्यात आलेले नीस या मार्गावरुन जाणाऱ्या कोकणकन्या रेल्वेने उडवून देत मार्गक्रमण केले. यावेळी रेल्वेच्या मोटारमनला ट्रॅकवर ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या नीसांबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, रेल्वे धडक या नीसांना बसल्यानंतर ही घटना मोटारमनच्या लक्षात आली. कुडाळ स्थानकापुढील मळगाव सावंतवाडी येथील स्टेशनवर पोहोचताच घडलेली घटना मोटारमनने तेथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितली. सावंतवाडी रेल्वेस्थानकातून याची माहिती कुडाळ पोलिसात देण्यात आली. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सिमेंटचे नीस उखडून रेल्वे रुळावर टाकण्यात आले होते. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अथवा कोणताही पुरावा हाती आलेला नाही. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रेल्वे प्रशासन अशा घटना टाळण्याकरिता कोणत्या उपाययोजना करत नसल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे. आणि उपाययोजना करत असेल तर त्याची अंमलबजावणी होते का पाहणेही गरजेचे आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता कोकणवासीयांचे रेल्वेचे स्वप्न साकारण्यात आले. मात्र, एकाच ट्रॅकवरुन येजा करणाऱ्या या कोकण रेल्वेसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकलेला आहे. पावसाच्या सुरुवातीपासूनच कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. यामुळे मार्गात अडथळे निर्माण होत असून गाड्यांचे वेळापत्रकही ढासळत जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही डोळ्यात अंजन घालून काम केले पाहिजे. कारण त्यांच्यावर हजारो प्राणांचा भार वाहिला जात आहे.विकृत प्रवृत्तीला आळा घालण्याची गरजकोकण रेल्वेच्या झाराप मुस्लिमवाडी येथील ट्रॅकवर सिंमेटचे नीस टाकणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकापेक्षा जास्त व्यक्तिंचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या समाजविघातक विकृत प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा, यावेळी वेळ चुकवून गेला दुदैवी प्रसंग पुढच्यावेळी संधी देईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अशा व्यक्तिंच्या मागावर राहत त्यांना अटक करुन शिक्षा दिली पाहिजे. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेतही त्रुटीकोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी चांगली सोय केली आहे. मात्र, सुरक्षेच्यादृष्टीने अनेक त्रुटी आढळून येत आहे. एखाद्या स्टेशनवर चार ते पाच तिकीट तपासणीस आढळतील मात्र, त्याच स्टेशनवर सुरक्षारक्षक एकच आढळून येतो. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर कायमस्वरु पी सुरक्षारक्षक आवश्यक आहेत. जंगल परिसरातील भागात कमी अंतराकरिता ट्रॅकमन ठेवणे गरजेचे आहे. अपघात घडला अथवा अन्य काही घडल्यास घटनास्थळी तेथील पोलीस पोहोचतात. मात्र, रेल्वेचा सुरक्षारक्षक पोहोचत नाही. याकडेही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहिल्यास त्यांना चुकांचे आकलन होईल. अपघात न होण्यासाठी काळजी आवश्यकरेल्वे रुळांनी सातत्याने पाहणी केली गेल्यास अपघाताच्या घटना घडणारच नाहीत. जंगल भागातील ट्रॅकचीही कसून पाहणी होणे गरजेचे असून रेल्वेच्या ट्रॅकबाबत छोटीशी बाबही गांभीर्याने घेण्यात आल्यास अशा घटना घडणार नाहीत.