शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भविष्यात जगावर अर्थिक मंदीचे सावट येईल- सुरेश प्रभू

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2022 21:03 IST

पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल, असेही ते म्हणाले

सावंतवाडी: दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची आर्थिक घडी बिघडत चालली आहे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात जगावर जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी  व्यक्त केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. "जागतिक पातळीवर आयात निर्यात वाढत गेली तरच आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार कमी व्हायला लागला की अस्तव्यवस्थेवर परिणाम होतो. युक्रेन युद्धामुळे  उर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप अमेरिकेमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर विजेची मागणी वाढणार आहे.त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागतील तिकडे विजेची मागणी वाढल्यास आणि पुरवठा कमी होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे," असे प्रभू म्हणाले.

"दुसऱ्या महायुद्धानंतर आता अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मिती वर परिणाम होईल.पुढील काळात मानव जगणार की नाही असा परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होणार आहे. जगातील अनेक देशातील नद्या या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल," अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली.

"जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाटा बरोबर इतर प्रदेश हे जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे.जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीSunil Prabhuसुनील प्रभू