शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

भविष्यात जगावर अर्थिक मंदीचे सावट येईल- सुरेश प्रभू

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2022 21:03 IST

पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल, असेही ते म्हणाले

सावंतवाडी: दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची आर्थिक घडी बिघडत चालली आहे असे चित्र दिसत आहे. त्यामुळे भविष्यात जगावर जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी  व्यक्त केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. "जागतिक पातळीवर आयात निर्यात वाढत गेली तरच आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार कमी व्हायला लागला की अस्तव्यवस्थेवर परिणाम होतो. युक्रेन युद्धामुळे  उर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप अमेरिकेमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर विजेची मागणी वाढणार आहे.त्याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागतील तिकडे विजेची मागणी वाढल्यास आणि पुरवठा कमी होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे," असे प्रभू म्हणाले.

"दुसऱ्या महायुद्धानंतर आता अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मिती वर परिणाम होईल.पुढील काळात मानव जगणार की नाही असा परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होणार आहे. जगातील अनेक देशातील नद्या या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल," अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली.

"जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाटा बरोबर इतर प्रदेश हे जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे.जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीSunil Prabhuसुनील प्रभू