शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

आय्लॉग कंपनीची जनसुनावणी रद्द

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

राजापूर तालुक्यातील प्रकल्प : मराठी अहवालाच्या प्रती न मिळाल्याने ग्रामस्थांच्या विरोधामुळे निर्णय

राजापूर : तालुक्यातील नाटे आंबोळगड येथील आय्लॉग पोर्ट प्रकल्पाची जनसुनावणी गुरुवारी रद्द करण्यात आली. कंपनीने पर्यावरणीय अहवालाची मराठी प्रत संबंधित ग्रामपंचायतींना न दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जनसुनावणी घेण्यास प्रखर विरोध केल्याने ती रद्द करण्यात आली. पुढील १५ दिवसांत सर्वांना पर्यावरणीय अहवालाची मराठी प्रत द्या, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संबंधित कंपनीला दिले आहेत. अहवालाची प्रत दिल्यानंतर पुढील ३० दिवसांत नव्याने जनसुनावणी घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.नाटे आंबोेळगड येथे येऊ घातलेल्या आय्लॉग पोर्ट कंपनीसाठी गुरुवारी जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र, कंपनीबाबत अपेक्षित माहिती दिली नसल्याचा आक्षेप स्थानिक ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे सरकारतर्फे आयोजित या जनसुनावणीमध्ये विरोध करण्याची तयारी जनतेतून सुरू झाली होती. त्याची कुणकुण लागल्याने सुनावणी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.नाटे आंबोळगड येथे प्रकल्पस्थळावर गुरुवारी सकाळी ११.०० वाजता जनसुनावणीला सुरुवात झाली. त्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, आमदार राजन साळवी व आय्लॉग कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. जनसुनावणीला सुरुवात होताच उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ व मच्छिमारांनी या प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेला कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नसताना असे प्रकल्प तुम्ही आणलेतच कसे, असा प्रश्न करण्यात आला. (प्रतिनिधी)१५ दिवसांत मराठीत प्रत देण्याचे आदेशनियमानुसार प्रकल्पाची जनसुनावणी घेण्याअगोदर परिसरातील सर्व ग्रामपंचायतींना तसेच येथील मच्छिमार सोसायट्यांना पर्यावरणीय अहवालाची मराठी प्रत देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित कंपनीने ती प्रत इंग्रजीत दिल्याने प्रारंभीपासूनच प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक सुरू होता. सातत्याने घोषणाबाजी केली जात होती. संतप्त जनतेपुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आजची जनसुनावणी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. पुढील पंधरा दिवसांत सर्व संबंधित ग्रामपंचायतींना व मच्छिमार सोसायट्यांना पर्यावरणीय अहवालाच्या मराठी भाषांतरित प्रती द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. अहवाल दिल्यानंतर पुढील ३० दिवसांनी जनसुनावणी घेण्यात येईल. त्यावेळी लोकांनी त्यांच्या शंका उपस्थित कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.