शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘डोंगरची काळी मैना’ संशोधनाअभावी दुर्लक्षित

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

संशोधनाची प्रतीक्षा : औषधी क्षमता असलेल्या गरीबांच्या मेव्याला राजाश्रयच नाही...

नीलेश जाधव -मार्लेश्वर कोकणामध्ये करवंदाला ‘डोंगरची काळी मैना’ असे म्हटले जाते. हे फळ कोणत्याही मेहनतीशिवाय तयार होत असते. गरीबांचा मेवा म्हणूनही करवंदाची ओळख आहे. करवंदाचे फळ मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र असे असतानादेखील डोंगरची ही काळी मैना संशोधनाअभावी आजपर्यंत दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे या काळ्या मैनेवर आता संशोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे.निसर्गाने कोकणाला दिलेली फळाची देणगी म्हणजे करवंद होय. हे फळ तयार होण्यासाठी कोणतीच मेहनत घ्यावी लागत नाही. करवंदाची झाडे मानवाकडून जमिनीत लावली जात नाहीत, तर ही झाडे डोंगरावर व सपाटावर जंगलामध्ये निसर्गत: वाढत असतात. करवंदाचे झाड हे काटेरी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी या झाडाचा उपयोग कुंपण घालण्यासाठी करतात.करवंदाच्या झाडापासून तयार होणारे फळ हे काही अंशी आंबट असते. तेवढेच ते पिकल्यावर गोडही असते. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात करवंदाच्या झाडाला फुले धरतात. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत हिरवीगार फळे धरतात आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये ही करवंदे पिकतात. पूर्ण पिकल्यानंतर ही फळे काळीभोर दिसतात. ग्रामीण भागात तर रानोमाळी पिकणारी ही करवंदे काढण्यासाठीचा आनंद काही औरच असतो.आंबट व गोड चवीची असणारी पिकलेली करवंदे खाल्ल्याशिवाय कोणालाच राहवत नाही. प्रत्येकाला पिकलेली काळीभोर करवंदे खावीशी वाटत असतात. पिकलेली करवंदे खातानाची मजा काही वेगळीच असते.काही ठिकाणी डोंगरात असलेली करवंदाची फळे मोठ्या प्रमाणात वाया जात असतात. त्यामुळे त्यावर योग्य संशोधन होऊन प्रक्रिया केल्यास करवंदांपासून अनेक पदार्थ बनवले जावू शकतात. मात्र, आजपर्यंत या काळ्या मैनेवर संशोधन न झाल्याने हा रानमेवा जणू दुर्लक्षितच राहिला आहे.कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. यामध्ये अनावधानाने करवंदाच्या जाळ्याही तोडल्या जात आहेत. करवंदाच्या जाळ्यांची अशीच कत्तल सुरु राहिल्यास आता प्रत्यक्षात चाखायला मिळणारी करवंदे भविष्यात पाहायलासुद्धा मिळणार नाहीत, अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे कोकणच्या या रानमेव्याचे संवर्धन होणे काळाची गरज बनली आहे.आहे बहुगुणी पण...!पिकलेली करवंदे खाण्याबरोबरच करवंदाचे जामही बनवले जातात तर सरबतही बनवले जाते. कच्च्या करवंदाचे लोणचेही तयार केले जाते. अशाप्रकारे करवंदाच्या फळाचा उपयोग केला जातो. मात्र, असे असले तरी करवंदाच्या फळावर योग्य असे संशोधन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.