शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

तळवणेतील पांडवकालीन तळीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST

पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाची : स्वच्छतेची आवश्यकता, निसर्गसौंदर्याचा आविष्कार

सुनील गोवेकर - आरोंदा -निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला असतानाही पर्यटनदृष्ट्या पूर्णपणे विकसित झालेला नाही. किंबहुना पर्यटन स्थळांच्या विकसित करण्याकडे दुर्लक्षच केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळवणे येथील बटकीची तळी हे स्थळ त्यातीलच एक आहे. ही तळी म्हणजे निसर्गसौंदर्याचा अप्रतिम आविष्कार आहे. या ऐतिहासिक स्थळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात काही पर्यटन स्थळे अशी आहेत की, ती विकासापासून वंचित राहिलेली आहेत. सद्यस्थितीत या तळीत गाळ साचलेला असून तो उपसा करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर असणारी ही बटकीची तळी व त्यासभोवताचा असणारा परिसर हा मनोवेधक आहे. या तळीबाबत असे सांगितले जाते की, ही तळी पांडवकालीन असून पांडवांनी तळी खोदण्याचे काम एका रात्रीत केले आहे. यामागील इतिहासाचे पुरावे मिळत नसले तरी येथील ज्येष्ठांनी ही तळी पांडवकालीन असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे या तळीला महत्त्व प्राप्त होत आहे. या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांसाठी हे खास आकर्षण ठरू शकेल. मात्र, कोणताही निधी मिळत नसल्याने ही तळी दुर्लक्षित राहिली आहे. तसेच इतरही साफसफाई करण्याची गरज आहे. या बटकीच्या तळीजवळ असणारे पांडवकालीन गोरक्ष गोठणदेव मंदिर हेही या परिसराचे निसर्गसौंदर्य वाढविते. हे मंदिर गाव पंचायतनापासून अलिप्त असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराची देखभाल केली जाते. या ठिकाणी वार्षिक पूजा करण्याची परंपरा असून ग्रामस्थांची या देवस्थानावर फार मोठी श्रध्दा आहे. पांडवकालीन असलेली ही बटकीची तळी आणि त्याच्या अवतीभवतीचा हा सारा निसर्गाने बहरलेला परिसर हा पर्यटकांसाठी भुरळ घालणारा आहे. देशी विदेशी पर्यटकांसाठी हे स्थळ नक्कीच आकर्षणाचे ठरु शकते. मात्र, त्यासाठी या स्थळाच्या स्वच्छतेसह देखभाल दुरुस्तीचीही आवश्यकता आहे. या पसिसराकडे होणारे दुर्लक्ष पर्यटनदृष्ट्या मारक ठरत आहे. या परिसरातील पर्यटन स्थळ सर्वांच्या दृष्टीपथास आल्यास यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह इतिहासप्रेमींकडूनहीहोत आहे.