शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आरोप न थांबविल्यास कुंडल्या बाहेर काढणार

By admin | Updated: January 20, 2017 22:56 IST

नारायण राणेंचा इशारा : प्रथमेश तेली मारहाण प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही

कणकवली : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता ताळतंत्र सोडले आहे. या दोघांसह विरोधकांनी जनतेची दिशाभूल करीत आमच्यावर विनाकारण आरोप करणे न थांबविल्यास या सर्वांच्या कुंडल्या बाहेर काढण्यात येतील, असे सांगतानाच राजन तेली यांचा पुत्र प्रथमेश याच्यावरील हल्ल्याशी नीतेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही. प्रथमेशला आतापर्यंत अनेकवेळा मार पडला आहे. तो फार ‘गुणी’ मुलगा आहे. अशी त्याची संभावनाही काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केली.येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, मंत्री चव्हाण, जठार हे भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर आपले वजन वाढावे यासाठी बिनबुडाची टीका आमच्यावर करीत आहेत. याबाबत त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषेत बोलायचे तर ‘याची उंची किती आणि माणूस बोलतो किती? अशी स्थिती आहे. प्रमोद जठार दलाल असून, मुंबईत दलाली करीत आहेत. असा माणूस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. यावरून भाजपची नीतिमत्ता स्पष्ट होते.आमच्यावर टीका करण्यापूर्वी सिंधुदुर्गात भाजप, शिवसेनेने केलेले एकतरी विकासकाम सांगावे. या जिल्ह्याच्या विकासात शिवसेना, भाजपचा वाटा शून्य आहे. सी-वर्ल्डचे काम बंद आहे. विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे अद्याप भूसंपादन झालेले नाही, रेडी पोर्ट रद्द केले आहे. आडाळी एमआयडीसीचे काम बंद झाले आहे. आतापर्यन्त चालू असलेली विकासकामे या सत्ताधाऱ्यांनी बंद केली आहेत.ज्यांना काँग्रेसने नाकारले त्यांना भाजप प्रवेश देत आहे. पारकर, आचरेकर जिल्हा भ्रष्टाचारमुक्त करू असे सांगतात. मात्र, भ्रष्टाचार करणे हाच यांचा धंदा आहे. दीपक सांडव हा चिटर आहे. त्याला मुख्यमंत्री आपल्या दालनात प्रवेश देतात. हेच खरे आश्चर्य आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण फार बोलू लागले आहेत. आतापर्यंत त्याची दखल घेतली नव्हती. मात्र, आता त्यांची कुंडली आगामी अधिवेशनात बाहेर काढणार आहे. रवींद्र चव्हाण स्वत:च्या चारित्र्यासारख्याच माणसांना भाजपमध्ये नेत आहेत. भाजपमध्ये जाणाऱ्यांची जनमाणसात काय प्रतिमा आहे, हे सर्वांना माहीत आहे.तर पालकमंत्री विकासासाठी निधी आणल्याचा पोकळ बाता मारत आहेत. जिल्हा परिषदकडे ११ कोटी रुपये निधी उपलब्ध असूनही ते खर्च करु शकत नाही. कारण, त्या प्रस्तावावर पालकमंत्र्यांना सही करायला वेळ नाही.राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समिती आघाडीबाबत आमच्याशी अजूनही संपर्क साधलेला नाही. आमची स्वबळावर लढण्याची ताकद आहे, मात्र राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर निश्चितच विचार करण्यात येईल, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.अवैध धंद्यांविरोधात निवडणुकीनंतर आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू, मटका, वेश्या व्यवसाय वाढला आहे. राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण वाढले आहे. सत्ताधाऱ्यांचा याला वरदहस्त आहे. त्यांची जोरदार हप्तेबाजी सुरू आहे. या निवडणुकीनंतर या विरोधात काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.