शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

अहवाल नसल्यास बडगा

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

भडकंबा ग्रामपंचायत : रवींद्र वायकर यांची ताकीद

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून ४ सदस्यांनी राजीनामा दिला. तंटामुक्ती पुरस्काराचा गैरवापर करण्यात आला. गावातील मुस्लिमवाडी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाले. व्यायामशाळा नसताना खोटी इमारत दाखवून २ लाखांचे साहित्यच २ वर्षात आणलेले नाही, अशी तक्रार तेथील शंकर लाड यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात केली. त्यामुळे खळबळ माजली. येत्या ७ दिवसांत याबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांनी न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, अशी तंबी रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. सोमवारी वायकर यांनी येथील अल्पबचत सभागृहात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात अत्यंत कुशलतेने २९ तक्रारींचा निपटारा केला. रस्ते, साकव, बिल्डर्सशी संबंधित विषयांवर यामध्ये विशेषत्त्वाने चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे उपस्थित होते. खेडशी येथील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत व बिल्डरने केलेले निकृष्ट बांधकाम, सातबारावर नावे दाखल करणे, स्मारक उभारणे, शेतकरी विमा अपघात, शिरगाव शेट्येवाडी खारभूमी योजना, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, खेडशीत बिल्डरने अवैधरित्या घातलेला गडगा, चिंचखरी वाडी वेसुर्लेतील ५५० ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न, कोळंबे संतनगर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न, सुरेंद्र घुडे यांच्या निवृत्ती वेतनाची निश्चिती, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मिरजोळे पाटीलवाडीतील जलवाहिनी खोलवर टाकणे, नागरी संरक्षण कार्यालय रत्नागिरीत सुरू होऊन नियुक्ती मिळणे, टॅँकरने दिवसाआड पाणी देऊन पाण्याची गैरसोय करणाऱ्या बिल्डरवर कारवाई यांसारख्या विषयांवर पालकमंत्री वायकर यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून या समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. काळबादेवी येथील पांडुरंग पेडणेकर यांच्या वडिलोपार्जित घराची घरपट्टी ग्रामपंचायतीने २००५ पासून बंद केली. ग्रामपंचायतीने आपणास न सांगता ठराव करून आपला घराचा हक्क काढून घेतला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. या जनता दरबारात हर्षल पटवर्धन, प्रभाकर कदम, सुरेंद्र घुडे, उदय गमरे, दत्तात्रय गावखडकर, विलास काळे, स्वाती पड्याळ यांच्यातर्फे उदय देसाई, प्रकाश शेट्ये, अनिल जाधव, सुमित भातडे, तुषार भोजे, प्रवीण सावंत, युवराज पाटील, सुनील साळुंखे, चंद्रशेखर डिचोलकर, युसुफ मुकादम, मनोजकुमार सावंत, शबनम झारी यांनी जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)भाट्येतील ‘ती’ जागाही ताब्यात घ्यावीभाट्येतील सर्व्हे नंबर १०१ मधील कृषक कामाच्या जमिनीच्या गैरवापराप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देऊनही त्यानंतरच्या दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी न झाल्याने संबंधितांनी बेकायदा बांधकाम हटवण्यास स्थगिती घेतली. या प्रकरणाचा फेरतपास झाला पाहिजे. याप्रकरणी योग्य तपास केला जावा, उर्वरित ८० गुंठे जागा शासनाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांनी केली. याबाबत वायकर यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.