शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

हल्यास आमदार, पालकमंत्री जबाबदार : राणे

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला

मालवण : आचरा येथे मच्छिमारांतील संघर्षाला पळपुटे आमदार व पुळचट पालकमंत्री जबाबदार आहेत. जनतेची या लोकप्रतिनिधीना चिंता नाही. बोटी पकडून माशांची लुट करणाऱ्या काही बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. मच्छिमारातील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असे राणे यावेळी म्हणाले. आचऱ्यातील संघर्षात पोलिसांनी योग्य दिशेने कार्यवाही केल्याबद्दल राणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संतोष आचरेकर, संजू परब, आंनद शिरवलकर, गुरुनाथ पेडणेकर, लीलाधर पराडकर, आबा हडकर, दीपक पाटकर, बबन मुंज, आशिष पाटील, कृष्णनाथ तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात या मतदार संघाचे नेतृत्व करताना असा प्रसंग घडला नाही. कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अडविण्याची धमक आपण १९९० साली दाखवली होती. मात्र, आताच्या आमदारांमध्ये धमकही नाही आणि हिंमतही नाही. मच्छिमारांना आपण नेहमीच आधुनिकतेची कास दिली. त्यातून त्यांनी प्रगतीही साधली. सर्वच मच्छिमारांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहिलो आहोत. यापुढे या संघर्षाचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होऊ नये. यासाठी मच्छिमारांत मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) एक रूपयाही आणला नाही ४पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात एकही रुपयाचा निधी आणला नाही. गतवर्षी बजेटला कात्री लावण्यात आली. ४सर्वच बाबतीत जिल्ह्याचा विकास रखडला. सी वर्ल्डसह पर्यटन प्रकल्पात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.