शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

हल्यास आमदार, पालकमंत्री जबाबदार : राणे

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला

मालवण : आचरा येथे मच्छिमारांतील संघर्षाला पळपुटे आमदार व पुळचट पालकमंत्री जबाबदार आहेत. जनतेची या लोकप्रतिनिधीना चिंता नाही. बोटी पकडून माशांची लुट करणाऱ्या काही बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. मच्छिमारातील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असे राणे यावेळी म्हणाले. आचऱ्यातील संघर्षात पोलिसांनी योग्य दिशेने कार्यवाही केल्याबद्दल राणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संतोष आचरेकर, संजू परब, आंनद शिरवलकर, गुरुनाथ पेडणेकर, लीलाधर पराडकर, आबा हडकर, दीपक पाटकर, बबन मुंज, आशिष पाटील, कृष्णनाथ तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात या मतदार संघाचे नेतृत्व करताना असा प्रसंग घडला नाही. कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अडविण्याची धमक आपण १९९० साली दाखवली होती. मात्र, आताच्या आमदारांमध्ये धमकही नाही आणि हिंमतही नाही. मच्छिमारांना आपण नेहमीच आधुनिकतेची कास दिली. त्यातून त्यांनी प्रगतीही साधली. सर्वच मच्छिमारांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहिलो आहोत. यापुढे या संघर्षाचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होऊ नये. यासाठी मच्छिमारांत मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) एक रूपयाही आणला नाही ४पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात एकही रुपयाचा निधी आणला नाही. गतवर्षी बजेटला कात्री लावण्यात आली. ४सर्वच बाबतीत जिल्ह्याचा विकास रखडला. सी वर्ल्डसह पर्यटन प्रकल्पात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.