शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हल्यास आमदार, पालकमंत्री जबाबदार : राणे

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला

मालवण : आचरा येथे मच्छिमारांतील संघर्षाला पळपुटे आमदार व पुळचट पालकमंत्री जबाबदार आहेत. जनतेची या लोकप्रतिनिधीना चिंता नाही. बोटी पकडून माशांची लुट करणाऱ्या काही बेजबाबदार मच्छिमार पुढाऱ्यांमुळे मच्छिमारांचा विकास खुंटला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. मच्छिमारातील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असे राणे यावेळी म्हणाले. आचऱ्यातील संघर्षात पोलिसांनी योग्य दिशेने कार्यवाही केल्याबद्दल राणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संतोष आचरेकर, संजू परब, आंनद शिरवलकर, गुरुनाथ पेडणेकर, लीलाधर पराडकर, आबा हडकर, दीपक पाटकर, बबन मुंज, आशिष पाटील, कृष्णनाथ तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात या मतदार संघाचे नेतृत्व करताना असा प्रसंग घडला नाही. कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना अडविण्याची धमक आपण १९९० साली दाखवली होती. मात्र, आताच्या आमदारांमध्ये धमकही नाही आणि हिंमतही नाही. मच्छिमारांना आपण नेहमीच आधुनिकतेची कास दिली. त्यातून त्यांनी प्रगतीही साधली. सर्वच मच्छिमारांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहिलो आहोत. यापुढे या संघर्षाचा परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होऊ नये. यासाठी मच्छिमारांत मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) एक रूपयाही आणला नाही ४पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात एकही रुपयाचा निधी आणला नाही. गतवर्षी बजेटला कात्री लावण्यात आली. ४सर्वच बाबतीत जिल्ह्याचा विकास रखडला. सी वर्ल्डसह पर्यटन प्रकल्पात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.