शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा निधी मिळाला नाही तर राजीनामा देईन...

By admin | Updated: January 5, 2015 23:22 IST

गजानन कीर्तिकर : आसूद येथे खासदार आदर्श गाव योजनेचा शुभारंभ

दापोली : खासदार आदर्श गाव या महत्त्वाकांक्षी योजनेतून आसूदचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. भविष्यात या विकासासाठी निधी देण्यात केंद्र सरकारकडून अडचण आल्यास मी माझ्या खासदारकीचा राजीनामा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देईन, असा इशारा मुंबईतील खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिला.दापोली तालुक्यातील आसूद या गावाची निवड खासदार आदर्श गाव योजनेसाठी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे. आज या योजनेचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत आसूद येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार कीर्तिकर म्हणाले की, नैतिक, भौतिक व आर्थिक विकास करणे, हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्राच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल, याचे आखणी केली आहे. केंद्र शासनाच्या ६४ योजना गावात राबवण्यात येणार असून, संपूर्ण गाव पुढील तीन वर्षात आदर्श करण्याचा आपला मानस आहे. या गावामध्ये निरक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. सुशिक्षित मंडळींना पर्यटन व अन्य संधीतून रोजगार मिळवून देण्याचा माझा मानस असून, बचत गटांनीही गावच्या विकासात चांगले योगदान दिले आहे. त्यांनाही मी प्रोत्साहन देणार असून, या परिसरात उत्पादित होणारा शेतमाल व फळांवर प्रक्रिया करण्यात येईल. या मालाला मुंबईत मी बाजारपेठ उपलब्ध करुन देणार आहे, असे त्यांनी सांगितले.या योजनेसाठी अमोल कीर्तीकर व नितीन सावे यांची संयुक्त नियुक्ती केले असून, ग्रामपंचायतीच्यावतीने ७२ जणांची एक समिती नेमण्यात आली आहे. हे सर्वजण अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांनीही या योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. नियम, अटी यांची सबब सांगू नये. कोणाच्याही दबावाखाली अधिकारी या योजनेच्या हेतूला बाधा आणत असतील तर मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करेन, असे ते म्हणाले.राज्य पातळीवर सरकारमध्ये मीही काही वर्षे काम केले असल्याने अधिकाऱ्यांची मानसिकता व पद्धत मला माहीत आहे. उगाचच अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम मी करत नाही, असे सांगतानाच अधिकाऱ्यांनीही याच पद्धतीने या योजनेसाठी काम करावे ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले, २०२० मध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसण्यासाठी जोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आखली आहे. यापुढे आमदारांसठी आदर्श गाव योजना लागू होणार आहे. आपण या योजनेसाठी दिवेआगर गावाची निवड केली असून, खासदार कीर्तीकर यांनी आसूद गाव दत्तक घेऊन आपल्यावरील भार कमी केला आहे.यावेळी आसूदचे सरपंच विष्णू वारसे यांनी उपस्थितांचे ग्रामपंचायतीच्यावतीने, तर वसंत शिर्के यांनी गावाच्यावतीने उपस्थितांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)