शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कृषी अर्थसंकल्प मांडल्यास देशाची उन्नती

By admin | Updated: April 6, 2016 23:54 IST

राजेंद्र आर्लेकर : सरगवेत रामघाट संस्थेचे उद्घाटन

कसई दोडामार्ग : शेतीप्रधान भारतात शेती प्राण आहे. त्याला दुय्यम लेखून चालणार नाही. शेतीला अव्वल स्थान दिले पाहिजे. देशाच्या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटसारखे अर्थसंकल्प मांडले जातात, त्याचप्रमाणे शेतीप्रधान देशात कृषी अर्थसंकल्प मांडला, तर देशाची कृषीक्षेत्रामार्फत उल्लेखनीय प्रगती होईल, असे प्रतिपादन गोवा वन व पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सरगवे येथील रामघाट फार्मर संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी केले.यावेळी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, प्रकाश गवस, प्रगतिशील शेतकरी बाबल नाईक, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम पंडित, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक बेडगे, रामघाट संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब राणे, संचालक यशवंत आठलेकर, विठ्ठल दळवी, जयवंत आठलेकर, शैलेश दळवी, संजय सावंत, देवेंद्र शेटकर, नीलेश साळगावकर, वैभव पांगम, रमेश बांदेकर, आदी उपस्थित होते.सरगवे सभामंडप येथे रामघाट फार्मर संस्थेचे उद्घाटन गोवा वन व पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मंत्री आर्लेकर म्हणाले, आपल्या देशात, राज्यात अनेक कंपन्या, संस्था स्थापन झाल्या. पैसा कमविणे हा त्यांचा उद्देश असतो; पण रामघाट फार्मर संस्थेचा तसा उद्देश नाही. शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. छोट्या, मध्यम शेतकऱ्यांच्या मर्यादित जमिनी, मर्यादित साधने, तंत्रज्ञानाचा अभाव, बाजारपेठेतील स्पर्धा, बाजारभाव, अस्थिरता, योग्य बाजारपेठ याचे सर्व मार्गदर्शन रामघाट संस्था प्रत्येक शेतकऱ्याला देणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्याचे काम संस्था करणार आहे. जैविक शेती ही आपली परंपरागत संस्कृती असून त्याची जपणूक केली पाहिजे, असेही आर्लेकर यांनी सांगितले. यावेळी अतुल काळसेकर, प्रकाश गवस यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब राणे यांनी प्रास्ताविक, विठ्ठल दळवी यांनी सूत्रसंचालन, तर यशवंत आठलेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)